पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात महाराष्ट्रातील मूर्तिकार पेणमध्ये एकवटले, पेण मध्ये बैठक

  81

 बाप्पाच्या गावातून पुकारला एल्गार ....... अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार .......


पेण(देवा पेरवी): पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयाने घातलेल्या बंदी विरोधात राज्यभरातील गणेश मूर्तीकार आक्रमक झाले आहेत. आज गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणमधून एल्गार पुकारण्यात आला. मुंबईसह राज्यातील गणेश मूर्तिकारांच्या संघटनांची बैठक आज पेण इथं पार पडली.


न्यायालयाच्या निर्णया विरोधात लढा देण्याचा निर्धार आजच्या सभेत करण्यात आला. इतर राज्यात पीओपी मूर्तींवर बंदी नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल मूर्तिकारानी उपस्थित केलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गाईड लाइन्स आमच्यावर लादल्या गेल्या आहेत.


यासंदर्भातील अहवाल वेळेत न दिल्याने ही वेळ आल्याचा आरोप मूर्तीकारांनी केलाय. सरकारने याबाबत वेळीच योग्य भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या