बोलीतून झाला मराठीचा प्रसार - डॉ. तारा भवाळकर

नवी दिल्ली : मराठी भाषेचा प्रसार केवळ लिखाणातूनच नव्हे, तर बोलीतूनही झाला आहे. भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते आणि ती समाजाला जोडणारी असावी, तोडणारी नव्हे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.


डॉ. भवाळकर म्हणाल्या, “एका स्त्रीने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणे हे महत्त्वाचे नाही, तर गुणवत्ता हा मुख्य मुद्दा आहे. संतांनी मराठी भाषा टिकवली आणि ती जिवंत ठेवली. भाषा फक्त ग्रंथांमध्ये साठवून ठेवल्यास तिचा उपयोग नाही, ती बोलली गेली पाहिजे. महाराष्ट्राला पांडुरंगाचे स्मरण करून देणारी हीच मराठी भाषा आहे, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना गावोगावी मावळे मिळाले.”



त्या पुढे म्हणाल्या, “विठ्ठल-रखुमाई हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, आमच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहेत. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’ असे सांगणारे संत सावता माळी आणि ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंक’ असे सांगणारे संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेला जीवंत ठेवले.”




Comments
Add Comment

‘वनतारा’च्या उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन

सीआयटीईएसच्या बैठकीत भारताच्या भूमिकेला मान्यता जामनगर : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकतेच पार पडलेल्या

रेल्वेमध्ये ‘हलाल’ प्रमाणित अन्न विकण्याची अधिकृत तरतूद नाही

'एनएचआरसी'च्या नोटिसीला भारतीय रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरण नवी दिल्ली  : रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या

नियामक रचनेत फेरफार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्य अधिकाऱ्यांना दिली लाच! ईडीच्या छापेमारीत प्रकरण आले उजेडात

मुंबई: विशिष्ट अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तसेच, राष्ट्रीय वैद्यकीय

लाल किल्ला पर्यटकांसाठी १० दिवस बंद

नवी दिल्ली : दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद

बलाढ्य भारताच्या तीन भूभागांवर टीचभर नेपाळचा दावा

१०० रुपयांच्या नोटेवर दाखवले भारताचे तीन भाग मुंबई : विशाल आणि बलाढ्य अशी जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या

‘घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का ? ’

नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मतदार यादी पुनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर