बोलीतून झाला मराठीचा प्रसार - डॉ. तारा भवाळकर

  93

नवी दिल्ली : मराठी भाषेचा प्रसार केवळ लिखाणातूनच नव्हे, तर बोलीतूनही झाला आहे. भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते आणि ती समाजाला जोडणारी असावी, तोडणारी नव्हे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.


डॉ. भवाळकर म्हणाल्या, “एका स्त्रीने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणे हे महत्त्वाचे नाही, तर गुणवत्ता हा मुख्य मुद्दा आहे. संतांनी मराठी भाषा टिकवली आणि ती जिवंत ठेवली. भाषा फक्त ग्रंथांमध्ये साठवून ठेवल्यास तिचा उपयोग नाही, ती बोलली गेली पाहिजे. महाराष्ट्राला पांडुरंगाचे स्मरण करून देणारी हीच मराठी भाषा आहे, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना गावोगावी मावळे मिळाले.”



त्या पुढे म्हणाल्या, “विठ्ठल-रखुमाई हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, आमच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहेत. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’ असे सांगणारे संत सावता माळी आणि ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंक’ असे सांगणारे संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेला जीवंत ठेवले.”




https://youtu.be/w384LFT14_4
Comments
Add Comment

प्रवास झाला स्मार्ट ! ‘हायवे यात्रा’ अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती नवी दिल्ली : जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, अनेक कामगार बेपत्ता

डेहराडून : उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केलेय. राज्याच्या

मोबाईलवरून आता मतदान

ई-मतदानाला परवानगी देणारे बिहार पहिले राज्य मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या मतदारांसाठी ही सुविधा पाटणा :

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी