बोलीतून झाला मराठीचा प्रसार - डॉ. तारा भवाळकर

नवी दिल्ली : मराठी भाषेचा प्रसार केवळ लिखाणातूनच नव्हे, तर बोलीतूनही झाला आहे. भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते आणि ती समाजाला जोडणारी असावी, तोडणारी नव्हे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.


डॉ. भवाळकर म्हणाल्या, “एका स्त्रीने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणे हे महत्त्वाचे नाही, तर गुणवत्ता हा मुख्य मुद्दा आहे. संतांनी मराठी भाषा टिकवली आणि ती जिवंत ठेवली. भाषा फक्त ग्रंथांमध्ये साठवून ठेवल्यास तिचा उपयोग नाही, ती बोलली गेली पाहिजे. महाराष्ट्राला पांडुरंगाचे स्मरण करून देणारी हीच मराठी भाषा आहे, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना गावोगावी मावळे मिळाले.”



त्या पुढे म्हणाल्या, “विठ्ठल-रखुमाई हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, आमच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहेत. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’ असे सांगणारे संत सावता माळी आणि ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंक’ असे सांगणारे संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेला जीवंत ठेवले.”




Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या