बोलीतून झाला मराठीचा प्रसार – डॉ. तारा भवाळकर

Share

नवी दिल्ली : मराठी भाषेचा प्रसार केवळ लिखाणातूनच नव्हे, तर बोलीतूनही झाला आहे. भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते आणि ती समाजाला जोडणारी असावी, तोडणारी नव्हे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.

डॉ. भवाळकर म्हणाल्या, “एका स्त्रीने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणे हे महत्त्वाचे नाही, तर गुणवत्ता हा मुख्य मुद्दा आहे. संतांनी मराठी भाषा टिकवली आणि ती जिवंत ठेवली. भाषा फक्त ग्रंथांमध्ये साठवून ठेवल्यास तिचा उपयोग नाही, ती बोलली गेली पाहिजे. महाराष्ट्राला पांडुरंगाचे स्मरण करून देणारी हीच मराठी भाषा आहे, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना गावोगावी मावळे मिळाले.”

त्या पुढे म्हणाल्या, “विठ्ठल-रखुमाई हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, आमच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहेत. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’ असे सांगणारे संत सावता माळी आणि ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंक’ असे सांगणारे संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेला जीवंत ठेवले.”

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago