'मला हलक्यात घेऊ नका'

नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. मागील काही दिवसांत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांना अनुपस्थित राहिलेले एकनाथ शिंदे महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमानांही गैरहजर राहिले आहेत. त्यांचा सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावातला मुक्काम वाढला होता. यामुळे महायुतीत तणाव आहे का ? शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज आहेत का ? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना, 'मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा' असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे नक्की कोणाला उद्देशून बोलत होते यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.



निवडणूक जिंकल्यावर येईन असे म्हणालो होतो म्हणून आता विदर्भाच्या दौऱ्यावर आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांचे नियोजीत कार्यक्रमानुसार विदर्भात दोन मोठे मेळावे होणार आहेत. याआधी पत्रकारांशी बोलताना शिंदेंनी सांगितले की, 'ज्यांनी मला हलक्यात घेतले, त्यांचा मी २०२२ मध्ये टांगा पलटी केला. सरकार बदललं आणि लोकांच्या मनातला डबल इंजिनचा सरकार आणून दिले. विधानसभा निवडणुकीच्या आधी सांगितले होते की, मी आणि देवेंद्र फडणवीस २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणू, यंदाच्या निवडणुकीत २३२ जागा आणल्या आहेत. त्यामुळे, लोकांनी मला हलक्यात घेऊ नये, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा.'



शिवसेनेची विधानसभेतील ताकद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विधानसभेत ५७ आमदार निवडून आले. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या ८१ जागा लढवल्या होत्या. एकूण मिळालेल्या आणि पात्र ठरलेल्या मतांपैकी १२.३८ टक्के अर्थात ७९ लाख ९६ हजार ९२० मते शिवसेनेने मिळवली.
Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,