मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी

  56

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पनवेल ते पळस्पे फाटा दौरा


मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पनवेल येथील पळस्पे फाटा येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता येणार असल्याने पहाटेपासून रस्त्यांच्या दुभाजक पाण्याने स्वच्छ करण्याचे काम सरकारी यंत्रणेने हाती घेतले होते. मंत्र्यांना पाहणी दौऱ्यात महामार्ग चकाचक दिसण्यासाठीची सरकारी यंत्रणेची लगीनघाई सुरू होती.

परंतू या दौऱ्याच्या सुरुवातीला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने नेमकी महामार्गाची सद्यस्थिती काय आहे याची पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री भोसले हे गुरुवारी दिवसभर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून मुंबई-गोवा महामार्गाचे काम नेमके का रखडले याची माहिती घेणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम आजही अपुर्णावस्थेत आहे. मागील वर्षी गणेशोत्सवापूर्वी तत्कालिन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोणत्याही स्थितीमध्ये महामार्गाचे पुर्ण केले जाईल असा दावा केला होता. परंतू अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. तर अनेक ठिकाणी भूसंपादनाच्या प्रश्नामुळे काही मीटरचे काम ठप्प आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पळस्पे फाटा (पनवेल) ते हातखांबा (रत्नागिरी) या २८१ किलोमीटरच्या पल्यामधील कामाची पाहणी करणार आहेत.

ठिकठिकाणी महामार्गावर काम सुरु असल्याने अचानक वळसा मार्ग असल्याने आणि त्याचठिकाणी पथदिव्यांची सोय नसल्याने रात्रीच्यावेळी अपघात होत असल्याने हा महामार्ग धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही विभागांकडून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असले तरी अपघातानंतर येथे रुग्णवाहिका आणि ट्रामा सेंटर असलेल्या सरकारी रुग्णालयाची सोय नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

रखडलेले काम लवकर होणार पूर्ण


मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोकणवासीयांना या अपूर्ण रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या महामार्गाचे काम लवकर पुर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देऊ असे ते म्हणाले.
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित