कॅनडातून ४०० किलो सोनं लुटणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी ईडीची चंदिगडमध्ये कारवाई

चंदिगड : कॅनडातून सुमारे ४०० किलो सोनं लुटणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी ईडीने चंदिगडमध्ये कारवाई सुरू केली आहे. आरोपी सिमरन प्रीत पनेसर चंदिगडमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच ईडीने धाड टाकली. पण तो सापडला नाही. ईडीने आरोपी सिमरन प्रीत पनेसर विरोधात परदेशात दरोडा टाकल्याचा आणि आर्थिक अफरातफरीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे.

कायद्यातील तरतुदीनुसार ईडीला भारतीय नागरिकावर परदेशात गुन्हा केल्याचा आरोप होत असल्यास तपासाचा अधिकार आहे. याच अधिकारात ईडीने तपास सुरू केला आहे. आरोपी सिमरन प्रीत पनेसरवर २२५ कोटी कॅनेडिअन डॉलर एवढ्या किंमतीचं सोनं लुटल्याचा आरोप आहे. हे सोनं अद्याप सापडलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पनेसरने त्याच्या मदतनीसांच्या सहकार्याने टोरंटो विमानतळावरुन २०२३ मध्ये ०.९९९९ टक्के शुद्ध सोन्याचे ६६०० बार म्हणजेच सुमारे ४०० किलो वजनाचे सोने पळवून नेले. स्विर्त्झलंडमधील झुरिच येथून सोन्याचा साठा मालवाहक विमानाने कॅनडात आला. विमान कॅनडात उतरताच सोन्याचा साठा एका कंटेनरमध्ये भरण्यात आला.

सिमरन प्रीत पनेसरचे सहकारी विमानतळाच्या गोदामात काम करत होते. याच सहकाऱ्यांच्या मदतीने बँकेत जाणार असलेला सोन्याचा साठा भरलेला कंटेनर सिमरन प्रीत पनेसरने गायब केला. बनावट कागदपत्रांच्या मदतीने गायब केलेला हा कंटेनर अद्याप सापडलेला नाही. या प्रकरणात सिमरन प्रीत पनेसरचा सहकारी परमपाल सिद्धू ब्रांप्टन याला अटक झाली. पण सिमरन प्रीत पनेसर अद्याप सापडलेला नाही. कॅनडा पोलीस त्याला शोधत आहेत. भारत सरकारला मिळालेल्या माहितीनुसार सिमरन प्रीत पनेसर कॅनडातून पळून भारतात चंदिगडमध्ये लपला आहे. ही माहिती मिळताच ईडीने कारवाई केली. पण सिमरन प्रीत पनेसर सापडला नाही. यामुळे ईडीने सिमरन प्रीत पनेसरसाठीची शोध मोहीम सुरू ठेवली आहे.
Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या