महाकुंभाहून परतताना कारचा अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पाटणा : प्रयागराजमध्ये महाकुंभात स्नान करुन घरी परतत असताना आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर आज २१ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला.यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.जगदीशपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींमध्ये पाटणा येथे राहणाऱ्या संजय कुमार, करुणा देवी, लाल बाबू सिंह, जूही राणी, आशा किरण, प्रियम कुमारी यांचा समावेश आहे.हे कुटुंब पाटणा येथे त्यांच्या घरी प्रयागराजहून जात होते. तेव्हा पाटण्यापासून ४० किमी आधी आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ कारचा अपघात झाला.



ही कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या ट्रकला जाऊन आदळली. अपघात इतका भयंकर होता की, अवघ्या पाच मिनिटांमध्ये कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.


अपघातानंतर जमलेल्या लोकांनी पोलिसांना संपर्क केला. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. पण त्याआधीच कारमधल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता.ड्रायव्हरला डुलकी आल्याने अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.