महाकुंभाहून परतताना कारचा अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पाटणा : प्रयागराजमध्ये महाकुंभात स्नान करुन घरी परतत असताना आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर आज २१ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला.यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.जगदीशपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींमध्ये पाटणा येथे राहणाऱ्या संजय कुमार, करुणा देवी, लाल बाबू सिंह, जूही राणी, आशा किरण, प्रियम कुमारी यांचा समावेश आहे.हे कुटुंब पाटणा येथे त्यांच्या घरी प्रयागराजहून जात होते. तेव्हा पाटण्यापासून ४० किमी आधी आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ कारचा अपघात झाला.



ही कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या ट्रकला जाऊन आदळली. अपघात इतका भयंकर होता की, अवघ्या पाच मिनिटांमध्ये कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.


अपघातानंतर जमलेल्या लोकांनी पोलिसांना संपर्क केला. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. पण त्याआधीच कारमधल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता.ड्रायव्हरला डुलकी आल्याने अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे