बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत, अली आणि हृदॉय मैदानात

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेश आणि भारत यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशने ४० षटकांत ५ बाद १६५ धावा एवढीच मजल मारली. जाकर अली आणि तौहिद हृदयॉय हे दोन अर्धशतकवीर मैदानावर पाय रोवून उभे आहेत. याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचे पाच फलंदाज ३५ धावांत परतले.



कर्णधार असलेल्या नजमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार आणि यष्टीरक्षक असलेल्या मुशफिकुर रहीम हे तीन फलंदाज शून्य धावा करुन परतले. सलामीवीर तन्झिद हसनने २५ तर मेहदी हसन मिराजने पाच धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन तर हर्षित राणाने एक बळी घेतला.
Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे