बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत, अली आणि हृदॉय मैदानात

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेश आणि भारत यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशने ४० षटकांत ५ बाद १६५ धावा एवढीच मजल मारली. जाकर अली आणि तौहिद हृदयॉय हे दोन अर्धशतकवीर मैदानावर पाय रोवून उभे आहेत. याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचे पाच फलंदाज ३५ धावांत परतले.



कर्णधार असलेल्या नजमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार आणि यष्टीरक्षक असलेल्या मुशफिकुर रहीम हे तीन फलंदाज शून्य धावा करुन परतले. सलामीवीर तन्झिद हसनने २५ तर मेहदी हसन मिराजने पाच धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन तर हर्षित राणाने एक बळी घेतला.
Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य