GBS News : अचानक जुलाब, हाताला अशक्तपणा; जीबीएसने आणखी दोघांचा मृत्यू

  56

पुणे : महाराष्ट्रात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ने धुमाकूळ घातला असून त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे, मुंबई, नाशिक पाठोपाठ राज्यातील अनेक शहरांमध्ये या आजाराचे थैमान सुरू असून अनेक रुग्ण आढळले आहेत. अशातच आता पुणे शहरात आणखी दोन रुग्णांचा गुलियन बॅरे सिन्ड्रोम या आजारानं मृत्यू झाला आहे. यामुळं या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. ससून सर्वोपचार रुग्णालयात ३७ वर्षांच्या पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. हा दौंड येथील रहिवासी होता.



हातात अशक्तपणा, अचानक जुलाब, जीबीएसमुळे रुग्ण त्रस्त


पुण्यातील खासगी रुग्णालयात २५ वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. ती नांदेड सिटीमधील रहिवासी होती. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. तिला १५ जानेवारीला जुलाबाचा त्रास झाला. त्यानंतर गिळण्यास त्रास सुरू होऊन तिला बराच अशक्तपणा जाणवू लागला. त्या तरूणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्याने तिलाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर १८ फेब्रुवारी रोजी तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर राज्यातील जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा हा २११ वर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भीतीच्या सावटाखली जगत आहेत.जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.



जीबीएसची स्थिती


एकूण रुग्णसंख्या – २११


रुग्णालयात दाखल – ५६


अतिदक्षता विभागात – ३६


व्हेंटिलेटरवर – १६


बरे झालेले रुग्ण – १४४


मृत्यू – ११

Comments
Add Comment

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे