बांगलादेशचा डाव २२८ धावांत आटोपला

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशचा डाव ४९.४ षटकांत २२८ धावांत आटोपला. बांगलादेशची अवस्था पाच बाद ३५ अशी होती त्यावेळी त्यांचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते. पण शतकवीर तौहिद हृदयॉय आणि अर्धशतकवीर जाकर अली तसेच रिशाद हुसेन या तीन फलंदाजांच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशने सर्वबाद २२८ धावा केल्या.





बांगलादेशकडून तन्झिद हसनने २५, सौम्या सरकारने शून्य, नजमुल हुसेन शांतोने (कर्णधार) शून्य, मेहदी हसन मिराजने पाच, तौहिद हृदयॉयने १००, मुशफिकुर रहीमने (यष्टीरक्षक) शून्य, जाकर अलीने ६८, रिशाद हुसेनने १८, तन्झीम हसन साकिबने शून्य, तस्किन अहमदने तीन, मुस्तफिजुर रहमानने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. बांगलादेशला ९ अवांतर मिळाले. भारताकडून मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणाने तीन, अक्षर पटेलने दोन बळी घेतले. शमीने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज, जाकर अली, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद या पाच जणांना बाद केले.





मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०२ बळी घेतले. त्याने आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आतापर्यंत ६० बळी घेतले आहेत. तो आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज झाला आहे. एकदिवसीय क्रिकेट या प्रकारात १०४ सामन्यात १०३ डावात ५१४० चेंडू टाकून ४७७५ धावा देत २०२ बळी घेतले. त्याची सरासरी २३.६४ एवढी आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या साखळी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमशी बरोबरी साधली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अझरुद्दीन आघाडीवर आहे. त्याने १५६ झेल घेतले आहेत. या विक्रमाशी विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धचा सामना सुरू असताना बरोबरी साधली. मोहम्मद शमीच्या चेंडूवर जाकर अलीने फटकावलेला चेंडू विराट कोहलीने झेलला. हाच विराट कोहलीचा एकदिवसीय क्रिकेटमधील १५६ वा झेल आहे.
Comments
Add Comment

IPL संपलं, आता FIFA World Cup 2026 चा फिव्हर! विराटपासून धोनीपर्यंत… कोणता भारतीय क्रिकेटर कुठल्या फुटबॉल स्टारचा फॅन?

IPL 2026 आता शेवटच्या टप्प्यात आहे. ३१ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना आहे. त्यानंतर क्रिकेटप्रेमींचं लक्ष थेट FIFA World Cup 2026

SRH vs RR Eliminator : 15 वर्षांच्या वैभवचे वादळ! 29 चेंडूत 97 धावा; ख्रिस गेलचाही विक्रम तुटला, हैदराबाद हादरलं...

Vaibhav Sooryvanshi : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अक्षरशः धुमाकूळ घालत

BCCI UPDATE : IPL मध्ये होणार सर्वात मोठा बदल? वर्षातून दोनदा रंगणार क्रिकेटचा महाकुंभ; BCCI ची नव्या प्लॅनवर चर्चा

MUMBAI : जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग असलेल्या आयपीएलमध्ये आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय

SRH vs RR Eliminator : आज IPL मध्ये होणार सर्व्हायव्हल वॉर; राजस्थान विरुद्ध हैदराबादमध्ये निर्णायक लढत, हरला तो थेट स्पर्धेबाहेर!

IPL PLAYOFF : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज

RCB VS GT : RCB ची थेट फायनलमध्ये एंट्री! गुजरातचा ९२ धावांनी धुव्वा

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये (Qualifier) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने गुजरात टायटन्सचा (GT) तब्बल ९२

Yash Dayal : हा माझा निर्णय नव्हता; यश दयालच्या वक्तव्यानं खळबळ, RCB व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष सवाल

IPL 2026 :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण