बांगलादेशचा डाव २२८ धावांत आटोपला

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशचा डाव ४९.४ षटकांत २२८ धावांत आटोपला. बांगलादेशची अवस्था पाच बाद ३५ अशी होती त्यावेळी त्यांचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते. पण शतकवीर तौहिद हृदयॉय आणि अर्धशतकवीर जाकर अली तसेच रिशाद हुसेन या तीन फलंदाजांच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशने सर्वबाद २२८ धावा केल्या.





बांगलादेशकडून तन्झिद हसनने २५, सौम्या सरकारने शून्य, नजमुल हुसेन शांतोने (कर्णधार) शून्य, मेहदी हसन मिराजने पाच, तौहिद हृदयॉयने १००, मुशफिकुर रहीमने (यष्टीरक्षक) शून्य, जाकर अलीने ६८, रिशाद हुसेनने १८, तन्झीम हसन साकिबने शून्य, तस्किन अहमदने तीन, मुस्तफिजुर रहमानने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. बांगलादेशला ९ अवांतर मिळाले. भारताकडून मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणाने तीन, अक्षर पटेलने दोन बळी घेतले. शमीने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज, जाकर अली, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद या पाच जणांना बाद केले.





मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०२ बळी घेतले. त्याने आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आतापर्यंत ६० बळी घेतले आहेत. तो आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज झाला आहे. एकदिवसीय क्रिकेट या प्रकारात १०४ सामन्यात १०३ डावात ५१४० चेंडू टाकून ४७७५ धावा देत २०२ बळी घेतले. त्याची सरासरी २३.६४ एवढी आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या साखळी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमशी बरोबरी साधली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अझरुद्दीन आघाडीवर आहे. त्याने १५६ झेल घेतले आहेत. या विक्रमाशी विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धचा सामना सुरू असताना बरोबरी साधली. मोहम्मद शमीच्या चेंडूवर जाकर अलीने फटकावलेला चेंडू विराट कोहलीने झेलला. हाच विराट कोहलीचा एकदिवसीय क्रिकेटमधील १५६ वा झेल आहे.
Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य