बांगलादेशचा डाव २२८ धावांत आटोपला

  54

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशचा डाव ४९.४ षटकांत २२८ धावांत आटोपला. बांगलादेशची अवस्था पाच बाद ३५ अशी होती त्यावेळी त्यांचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते. पण शतकवीर तौहिद हृदयॉय आणि अर्धशतकवीर जाकर अली तसेच रिशाद हुसेन या तीन फलंदाजांच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशने सर्वबाद २२८ धावा केल्या.





बांगलादेशकडून तन्झिद हसनने २५, सौम्या सरकारने शून्य, नजमुल हुसेन शांतोने (कर्णधार) शून्य, मेहदी हसन मिराजने पाच, तौहिद हृदयॉयने १००, मुशफिकुर रहीमने (यष्टीरक्षक) शून्य, जाकर अलीने ६८, रिशाद हुसेनने १८, तन्झीम हसन साकिबने शून्य, तस्किन अहमदने तीन, मुस्तफिजुर रहमानने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. बांगलादेशला ९ अवांतर मिळाले. भारताकडून मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणाने तीन, अक्षर पटेलने दोन बळी घेतले. शमीने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज, जाकर अली, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद या पाच जणांना बाद केले.





मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०२ बळी घेतले. त्याने आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आतापर्यंत ६० बळी घेतले आहेत. तो आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज झाला आहे. एकदिवसीय क्रिकेट या प्रकारात १०४ सामन्यात १०३ डावात ५१४० चेंडू टाकून ४७७५ धावा देत २०२ बळी घेतले. त्याची सरासरी २३.६४ एवढी आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या साखळी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमशी बरोबरी साधली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अझरुद्दीन आघाडीवर आहे. त्याने १५६ झेल घेतले आहेत. या विक्रमाशी विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धचा सामना सुरू असताना बरोबरी साधली. मोहम्मद शमीच्या चेंडूवर जाकर अलीने फटकावलेला चेंडू विराट कोहलीने झेलला. हाच विराट कोहलीचा एकदिवसीय क्रिकेटमधील १५६ वा झेल आहे.
Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार