Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील त्या जप्त मालमत्तांचा होणार फेरलिलाव

कल्याण  : मालमत्ता कर उत्त्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. मालमत्ता कर थकीत ठेवणा-या मिळकतधारकांना कराचा भरणा करणेबाबत वारंवार नोटीस पाठवनूही त्यास प्रतिसाद मिळत नाही. याची गंभीर दखल घेवून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने १/अ, २/ब व ३/क प्रभागातंर्गत १५ मालमत्ता जप्त केल्या असून, त्याचा लिलाव १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आला. सदर लिलावास प्रतिसाद मिळालेला नसल्याने, या मिळकतींचा फेरलिलाव काढण्यात येणार आहे.



नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा वेळेत व नियमित करावा यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी आवाहन केले जाते.मात्र,अनेक मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर थकवला जातो. मालमत्ता जप्तीची कारवाई करुनही थकबाकी न भरता नोटीसला प्रतिसादही दिला जात नाही. अशा,थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई सुरु आहे.थकीत मालमत्ता कराबाबत सातत्याने जप्ती/अटकावणी व लिलावाची कारवाई महानगरपालिकेतर्फे केली जाते. तरी, अशी कठोर कारवाई टाळण्याकरीता नागरीकांनी मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील