Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील त्या जप्त मालमत्तांचा होणार फेरलिलाव

कल्याण  : मालमत्ता कर उत्त्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. मालमत्ता कर थकीत ठेवणा-या मिळकतधारकांना कराचा भरणा करणेबाबत वारंवार नोटीस पाठवनूही त्यास प्रतिसाद मिळत नाही. याची गंभीर दखल घेवून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने १/अ, २/ब व ३/क प्रभागातंर्गत १५ मालमत्ता जप्त केल्या असून, त्याचा लिलाव १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आला. सदर लिलावास प्रतिसाद मिळालेला नसल्याने, या मिळकतींचा फेरलिलाव काढण्यात येणार आहे.



नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा वेळेत व नियमित करावा यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी आवाहन केले जाते.मात्र,अनेक मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर थकवला जातो. मालमत्ता जप्तीची कारवाई करुनही थकबाकी न भरता नोटीसला प्रतिसादही दिला जात नाही. अशा,थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई सुरु आहे.थकीत मालमत्ता कराबाबत सातत्याने जप्ती/अटकावणी व लिलावाची कारवाई महानगरपालिकेतर्फे केली जाते. तरी, अशी कठोर कारवाई टाळण्याकरीता नागरीकांनी मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे