Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील त्या जप्त मालमत्तांचा होणार फेरलिलाव

कल्याण  : मालमत्ता कर उत्त्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. मालमत्ता कर थकीत ठेवणा-या मिळकतधारकांना कराचा भरणा करणेबाबत वारंवार नोटीस पाठवनूही त्यास प्रतिसाद मिळत नाही. याची गंभीर दखल घेवून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने १/अ, २/ब व ३/क प्रभागातंर्गत १५ मालमत्ता जप्त केल्या असून, त्याचा लिलाव १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आला. सदर लिलावास प्रतिसाद मिळालेला नसल्याने, या मिळकतींचा फेरलिलाव काढण्यात येणार आहे.



नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा वेळेत व नियमित करावा यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी आवाहन केले जाते.मात्र,अनेक मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर थकवला जातो. मालमत्ता जप्तीची कारवाई करुनही थकबाकी न भरता नोटीसला प्रतिसादही दिला जात नाही. अशा,थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई सुरु आहे.थकीत मालमत्ता कराबाबत सातत्याने जप्ती/अटकावणी व लिलावाची कारवाई महानगरपालिकेतर्फे केली जाते. तरी, अशी कठोर कारवाई टाळण्याकरीता नागरीकांनी मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.