Thane Update : ठाण्यात उष्म्याचा पारा @३७

ठाणे : हिवाळ्यात आल्हादायक वातावरण असेल असे भाकीत करण्यात आले होते.मात्र,ऐन थंडीत उष्म्याच्या चटका जाणवू लागला आहे. गेल्याच पाच सहा दिवसांपासून ठाणे शहरातला तापमानाचा पारा वाढला असून,मंगळवरी उष्म्याचा पारा कमाल ३७.०२ अंशावर पोहोचला आहे. येत्या काही दिवसामध्ये हा पारा खाली येईल,असे भाकीत हवामान वेधशाळा करतअसली तरी यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी तापदायक ठरणार असल्याची जणू चाहूल निसर्गाने दिली आहे. होळीला अजून तब्बल एक महिन्याचा कालावधी असताना,या अगोदरच उन्हाच्या झळा ठाणेकरांना सोसाव्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसाप्रमाणे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे ठाणेकरांसाठी त्रासदायक बनले आहे.



एरवी कमाल २६ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान असणा-या ठाणे शहरात आता कमाल तापमान तब्बल ३६ ते ३७ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत झेपावल्यामुळे उन्हाळ्याचा फील ऐन हिवाळयात जाणवू लागला आहे. मंगळवारी किमान तापमान अंश सेल्सियस तर कमाल तापमान सेलसियस नोंदवले गेले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापक कक्षाकडून मिळाली आहे.गेल्या पाच सहा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत आहे.मात्र,वाढणारे तापमान हे क्षणिक आहे. येणाऱ्या पुढच्या काही दिवसात तापमानाचा पारा खाली येऊन चांगली थंडी पडेल,असे संकेत वेधशाळेने दिले आहेत.


पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव ठाणेकर घेत असताना,दुसरीकडे दुपारी कडाक्याच्या उष्मा वाढला आहे.ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीचे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या उन्हाचा कोणाला त्रास होत असेल तर शक्यतो बाहेर न पडण्याच्या सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन चक्कर येणे,श्वसन विकाराचा त्रास बळावण्याचा संभव असतो.या उन्हात सुर्यकिरणांचा आघात थेट डोळ्यांमधील नेत्रजलावर होतो. त्यामुळे काहीवेळा डोळ्यासमोर अंधारी येणे,भिरभिरणे असे
प्रकार होतात.

Comments
Add Comment

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

Honda India Power Products Q2 Results: होंडा इंडिया पॉवरचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात थेट ३०.८०% वाढ

मोहित सोमण: होंडा इंडिया पॉवर प्रॉपर्टी लिमिटेडने आपला आर्थिक तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

महाराष्ट्र शासनाचे रत्ने व आभूषणे धोरण जाहीर

मुंबई : राज्य सरकारनं रत्ने आणि आभूषण उद्योगाला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेण्यासाठी राज्य शासनाने ‘रत्ने व