'...म्हणून छावा चित्रपटावरील करमणूक कर रद्द करू शकत नाही'

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर साकारलेला छावा हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी देशभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. आता या चित्रपटाला करमणूक कर माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना करणमूक कर का रद्द करू शकत नाही याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



महाराष्ट्रात करमणूक कर रद्द झाला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेला करमणूक कर २०१७ मध्येच रद्द करण्यात आला आहे. यामुळे चित्रपटावरील करमणूक कर रद्द करण्याची मागणी झाली तरी आता करमणूक कर रद्द होऊ शकत नाही. रद्द करण्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारितला करमणूक कर अस्तित्वात नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुण्यात शिवनेरी किल्ला येथे आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी करमणूक कराबाबतचा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणमूक कर या बाबतची राज्याची सध्याची स्थिती सांगितली.

Comments
Add Comment

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर

BMC : स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे नमुद केले. स्वच्छतेकडे एखाद्या

BMC : 'मुंबईत एकही गटाराचे झाकण उघडे राहता कामा नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका अर्थात गटाराची झाकणे उघडी राहणार नाही, याची