'...म्हणून छावा चित्रपटावरील करमणूक कर रद्द करू शकत नाही'

  145

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर साकारलेला छावा हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी देशभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. आता या चित्रपटाला करमणूक कर माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना करणमूक कर का रद्द करू शकत नाही याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



महाराष्ट्रात करमणूक कर रद्द झाला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेला करमणूक कर २०१७ मध्येच रद्द करण्यात आला आहे. यामुळे चित्रपटावरील करमणूक कर रद्द करण्याची मागणी झाली तरी आता करमणूक कर रद्द होऊ शकत नाही. रद्द करण्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारितला करमणूक कर अस्तित्वात नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुण्यात शिवनेरी किल्ला येथे आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी करमणूक कराबाबतचा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणमूक कर या बाबतची राज्याची सध्याची स्थिती सांगितली.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून