'...म्हणून छावा चित्रपटावरील करमणूक कर रद्द करू शकत नाही'

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर साकारलेला छावा हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी देशभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. आता या चित्रपटाला करमणूक कर माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना करणमूक कर का रद्द करू शकत नाही याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



महाराष्ट्रात करमणूक कर रद्द झाला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेला करमणूक कर २०१७ मध्येच रद्द करण्यात आला आहे. यामुळे चित्रपटावरील करमणूक कर रद्द करण्याची मागणी झाली तरी आता करमणूक कर रद्द होऊ शकत नाही. रद्द करण्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारितला करमणूक कर अस्तित्वात नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुण्यात शिवनेरी किल्ला येथे आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी करमणूक कराबाबतचा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणमूक कर या बाबतची राज्याची सध्याची स्थिती सांगितली.

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ