मिडी बस गाड्यांच्या कमतरतेमुळे बस मार्ग बंद करण्याची वेळ

  32

भांडुप, कांजूरमार्गसारख्या ठिकाणी मोठा फटका बसणार


मुंबई(अल्पेश म्हात्रे): बेस्ट उपक्रमाकडील बस गाड्या या पुढील काही महिन्यात भंगारात जात असल्याने व पर्यायी मिडी बस गाड्या नसल्याने बेस्ट उपक्रमावर मिडी बस मार्ग बंद करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या वेळेस बस गाड्या नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होणार असून भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, मालाड येथे संतापाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बस गाठ्यांची प्रबंड कमतरता निर्माण झाली आहे. स्वमालकीच्या बस गाडया भंगारात जात असल्याने व त्यातच खाजगी बस गाड्या वेळेवर दाखल न झाल्याने बेस्टला स्वतःच्या व कंत्राटदाराच्या बस गाडया पुरवण्यात कसरत करावी लागत आहे. त्यात स्वमालकीचा बस ताफा हा एक हजारपेक्षा कमी झाला असून येत्या पुढील तीन ते चार महिन्यात जे एन एन यु आर एम अंतर्गत साडेसातशे बस गाड्याही भंगारात जाणार आहेत. त्यात २५० मिट्टी बस गाडांचा समावेश असून त्या बंद झाल्या तर भांडुप, मुलुंड, कांजूरमार्ग, घाटकोपर, मालाड मासारख्या डोंगराळ व छोट्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. सध्या कंत्राटदारांकडे मिडी बस गाड्या नाहीत. मिडी बस गाड्या असलेल्या हंसा सिटी बस व एम पी जी या कंत्राटदारांनी या आधीच बेस्टला रामराम ठोकला


त्यातच येत्या काही महिन्यात बेस्टच्या ताफ्यातून मिडी बसगाड्या हद्दपार झाल्यास व मिट्टी बस गाड्या उपलब्ध नसल्याने करायचे काय असा प्रश्न बेस्ट अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. भांडुप कांजुर मार्ग येथील टेंभी पाड़ा, नरदास नगर, भट्टीपाडा, तुलशेत पाडा, कोंकण नगर, हनुमान नगर, प्रतापनगर, विक्रोळी येथील नाग बाबा मंदिर, पार्कसाईट, मालाड येथील आप्पा पाडा तसेच कुलाबा येथील गीता नगर, जुहू येथील मोरा गांव सांताक्रूझ येथील दत्त मंदिर मेथील बस प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे बेस्टच्या या मिनी बसगाड्यांचा वापर जेथे प्रवाशांचा कमी प्रतिसाद आहे त्याठिकाणी हि करण्यात येतो. सध्या ओलेक्ट्रा व डागा या कंत्राटदाराकडे मिनी बस गाड्या असून त्या या छोट्या व चिंचोळ्या मार्गावर धावू शकत नाहीत.



बसमार्गावर परिणाम


[१३९ छत्रपती शिवाजी महाराण टर्मिनस ते गीता नगर। ६०२ कांजूरमार्ग ते हिरानंदानी पवई 1 ६०३ अमृत नगर ते आर सी एफ वसाहत भांडुप] .६०५ भांडुप ते टेम्बीपाडा ] [६०६ भांडुप ते नरदास नगर ] [ ६०७भाखुप वे तुलशेतीपाडा [ ६०८ कांजूरमार्ग ते हनुमान नगर] [ ६१२ काजूरमार्ग से हनुमान नगर मार्ग प्रताप नगर [ ६१३ विद्याविहार पश्चिम ते सुंदर बाम [६१८ सांताक्रूझ पूर्व ते दत्त मंदिर गार्ग। ६२४ मालाड ते आप्पापाडा ॥ ६२७अंधेरी स्थानक ते नोरा गांव जुहू ।

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.