GBS : पुणेकरांवर जीबीएसचे वाढते सावट! आणखी एका तरूणाचा मृत्यू

  76

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यभरात जीबीएसच्या (GBS) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई अशा ठिकाणाहून जीबीएसचे रुग्ण आढळत असून पुणे शहरात या आजाराचे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. आतापर्यंत पुण्यात ८ जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला होता. तर आता यात आणखी एका तरूणाची भर पडली आहे. (pune news)



पुण्यातल्या वाघोली येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाचा जीबीएस आजारामुळे मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाला जीबीएसची लागण झाली होती. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाला श्वसनाला त्रास होत होता आणि स्नायू खूपच कमजोर झाले होते. ससून रुग्णालयात या तरुणावर ३ फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर आता पुण्यात जीबीएस रुग्णांच्या मृतांचा आकडा ९ वर गेला असून राज्यातील जीबीएस रुग्णांच्या मृत्यूचा आकडा १४ वर गेला आहे.


दरम्यान, पुण्यामध्ये सध्या जीबीएसचे एकूण २१० रुग्ण आहेत. यामधील ४१ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर उर्वरीत रुग्णांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक