Mumbai-Pune Expressway Hotel : मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवरील हॉटेलचे सांडपाणी पातळगंगा नदीत

  63

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या बाजूच्या फुडमॉल हॉटेलसह इतर हॉटेल, पेट्रोल पंपातील सांडपाणी पातळगंगा नदीत सोडले जात असल्यामुळे नदी दूषित झाली आहे. पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आवाज उठविला जात असतानाही हॉटेल चालकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरूण जाधव यांनी हॉटेल मालकांविरोधात राष्ट्रीय हरित लवदाकडे तक्रार करणार असल्याचे इशारा दिला आहे.



मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका शेजारी मुंबईकडून पुण्याला जाताना फूड वे मॉल्स आहे, ते मुंबई-पुणे ट्रक टर्मिनल यांच्या लायसेन्स वर आपले फूड मॉल्स चालवत आहेत. त्यांनी स्वतंत्र परवाना घेणे आवश्यक आहे. १४ जानेवारी रोजी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव फूड मॉल्स चे सांडपाणी पाताळगंगा नदी मध्ये जात आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटो देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना तक्रार केली होती. २८ जानेवारी रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने थातुरमातुर कारवाई केली होती. १५फेब्रुवारी रोजी पहाणी केली असता एचपी पंपाच्या अखत्यारीतील उडपी हॉटेल आपले सांडपाणी अजूनही पाताळगंगा नदी मध्ये सोडत असल्याचे निदर्शनास आल्याचे अरूण जाधव यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त; विद्यार्थी तणावाखाली

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक