Mumbai-Pune Expressway Hotel : मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवरील हॉटेलचे सांडपाणी पातळगंगा नदीत

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या बाजूच्या फुडमॉल हॉटेलसह इतर हॉटेल, पेट्रोल पंपातील सांडपाणी पातळगंगा नदीत सोडले जात असल्यामुळे नदी दूषित झाली आहे. पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आवाज उठविला जात असतानाही हॉटेल चालकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरूण जाधव यांनी हॉटेल मालकांविरोधात राष्ट्रीय हरित लवदाकडे तक्रार करणार असल्याचे इशारा दिला आहे.



मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका शेजारी मुंबईकडून पुण्याला जाताना फूड वे मॉल्स आहे, ते मुंबई-पुणे ट्रक टर्मिनल यांच्या लायसेन्स वर आपले फूड मॉल्स चालवत आहेत. त्यांनी स्वतंत्र परवाना घेणे आवश्यक आहे. १४ जानेवारी रोजी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव फूड मॉल्स चे सांडपाणी पाताळगंगा नदी मध्ये जात आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटो देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना तक्रार केली होती. २८ जानेवारी रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने थातुरमातुर कारवाई केली होती. १५फेब्रुवारी रोजी पहाणी केली असता एचपी पंपाच्या अखत्यारीतील उडपी हॉटेल आपले सांडपाणी अजूनही पाताळगंगा नदी मध्ये सोडत असल्याचे निदर्शनास आल्याचे अरूण जाधव यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी