राहुरी तालुक्यात अवैध गॅस साठ्यांचे जाळे

प्रशासन मात्र डोळे असून आंधळे


राहुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात स्वयंपाकाच्या गॅसचे अवैध साठे बिनदिक्कत अधिकृत गॅस एजन्सीज कडून खाजगी दुकानदारांकडे करण्यात येत आहे यातून मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतय की काय अशा प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.


तालुक्यात राहुरी, वांबोरी, टाकळीमिया या ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅसचे प्रमुख वितरक आहेत त्यात भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या दोन प्रमुख कंपन्यांचेच वितरक आहेत. या ठिकाणाहून तालुक्याच्या ग्रामीण भागात गॅसचे वितरण होत असते. काही भागात एजन्सीची गॅस वितरण करणारी वाहने दररोज जा-ये करत असतात तर काही भागात ही वाहने दिवसाआड दोन दिवसाआड जात येत असतात. ही गॅस वितरण करणारी वाहने गावागावात ठराविक ठिकाणी थांबून ग्राहकांना गॅसटाक्यांचे वितरण करतात.



हे वितरण करत असताना ठराविक वेळेत केले जाते मात्र या वाहनांमधून गावातील काही ठराविक दुकानांमध्ये गॅसटाक्यांचे साठे करून ते ग्राहकांना दिले जातात त्याचे दरही जास्तीचे असतात गॅसवितरण करणारे वाहन निघून गेल्याने ग्राहकांना नाईलाजाने या ठिकाणाहून गॅसटाक्या न्याव्या लागतात. वरून दरही अव्वाच्या सव्वा द्यावा लागतो. ग्रामीण भागातील जनतेला पर्याय नसल्याने त्यांना अशा ठिकाणाहून गॅसटाकी नेणे क्रमप्राप्त होतं आहे.

केंद्र व राज्य शासनाने गॅस एजन्सीची परवानगी देताना अनेक नियम व अटी सदर एजन्सीला घालून दिल्या आहेत. मग त्यात टाक्या साठविण्याचे गोडाऊन गावापासून दूर असावे, त्याच्या सुरक्षे विषयीची खातरजमा दररोज केली जावी, या खेरीज अन्य सुरक्षेविषयक नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शासन धोरण आहे. मात्र गावागावात ठेवलेल्या या गॅसटाक्यांच्या सुरक्षेविषयी काय ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.गावातील वर्दळीच्या ठिकाणी या गॅसटाक्या ठेवलेल्या असल्याचे सर्रासपणे आढळून येत आहे.


मागे दोन महिन्यांपूर्वी अशाच एका किराणा दुकानाला वीजेच्या शाॅर्टसर्कीटमुळे भीषण आग लागून संपुर्ण दुकान भस्मसात झाले होते. मात्र या दुकानाच्या अगदी शेजारीच साठविण्यात आलेल्या गॅस टाक्यांना सुदैवाने आगीची झळ पोहोचली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने सहसा ग्रामीण भागात शासकीय अधिकारी कर्मचारी अपवादानेच फिरकत असतात त्याचाच फायदा तर हे वितरक घेत नसावेत ? अशाही शंका जनतेतून व्यक्त होत आहे. यासंदर्भात प्रशासन मात्र डोळे असून आंधळ्याची भुमिका घेत असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी