राहुरी तालुक्यात अवैध गॅस साठ्यांचे जाळे

  42

प्रशासन मात्र डोळे असून आंधळे


राहुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात स्वयंपाकाच्या गॅसचे अवैध साठे बिनदिक्कत अधिकृत गॅस एजन्सीज कडून खाजगी दुकानदारांकडे करण्यात येत आहे यातून मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतय की काय अशा प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.


तालुक्यात राहुरी, वांबोरी, टाकळीमिया या ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅसचे प्रमुख वितरक आहेत त्यात भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या दोन प्रमुख कंपन्यांचेच वितरक आहेत. या ठिकाणाहून तालुक्याच्या ग्रामीण भागात गॅसचे वितरण होत असते. काही भागात एजन्सीची गॅस वितरण करणारी वाहने दररोज जा-ये करत असतात तर काही भागात ही वाहने दिवसाआड दोन दिवसाआड जात येत असतात. ही गॅस वितरण करणारी वाहने गावागावात ठराविक ठिकाणी थांबून ग्राहकांना गॅसटाक्यांचे वितरण करतात.



हे वितरण करत असताना ठराविक वेळेत केले जाते मात्र या वाहनांमधून गावातील काही ठराविक दुकानांमध्ये गॅसटाक्यांचे साठे करून ते ग्राहकांना दिले जातात त्याचे दरही जास्तीचे असतात गॅसवितरण करणारे वाहन निघून गेल्याने ग्राहकांना नाईलाजाने या ठिकाणाहून गॅसटाक्या न्याव्या लागतात. वरून दरही अव्वाच्या सव्वा द्यावा लागतो. ग्रामीण भागातील जनतेला पर्याय नसल्याने त्यांना अशा ठिकाणाहून गॅसटाकी नेणे क्रमप्राप्त होतं आहे.

केंद्र व राज्य शासनाने गॅस एजन्सीची परवानगी देताना अनेक नियम व अटी सदर एजन्सीला घालून दिल्या आहेत. मग त्यात टाक्या साठविण्याचे गोडाऊन गावापासून दूर असावे, त्याच्या सुरक्षे विषयीची खातरजमा दररोज केली जावी, या खेरीज अन्य सुरक्षेविषयक नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शासन धोरण आहे. मात्र गावागावात ठेवलेल्या या गॅसटाक्यांच्या सुरक्षेविषयी काय ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.गावातील वर्दळीच्या ठिकाणी या गॅसटाक्या ठेवलेल्या असल्याचे सर्रासपणे आढळून येत आहे.


मागे दोन महिन्यांपूर्वी अशाच एका किराणा दुकानाला वीजेच्या शाॅर्टसर्कीटमुळे भीषण आग लागून संपुर्ण दुकान भस्मसात झाले होते. मात्र या दुकानाच्या अगदी शेजारीच साठविण्यात आलेल्या गॅस टाक्यांना सुदैवाने आगीची झळ पोहोचली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने सहसा ग्रामीण भागात शासकीय अधिकारी कर्मचारी अपवादानेच फिरकत असतात त्याचाच फायदा तर हे वितरक घेत नसावेत ? अशाही शंका जनतेतून व्यक्त होत आहे. यासंदर्भात प्रशासन मात्र डोळे असून आंधळ्याची भुमिका घेत असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक