ज्ञानेश कुमार देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधानांच्या नेतृत्वातील बैठकीत निर्णय

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील सीईसी म्हणून नियुक्तीसाठी कायदा मंत्रालयाने अधिसूचनाही जारी केली आहे.


१९८८च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी गेल्या वर्षी मार्चपासून निवडणूक आयुक्त म्हणून काम कर आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवृत्त झाल्यानंतर ते पदभार स्वीकारतील. १८ फेब्रुवारीला राजीव कुमार निवृत्त होत आहे.


देशाच्या नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावावर विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक बैठक झाली. नॉर्थ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ मंगळवारी संपत आहे.


जुन्या व्यवस्थेनुसार, तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्त बनवले जात असे. तथापि, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्यानुसार, आता नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड एका समितीद्वारे केली जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाच्या शर्ती) कायदा, 2023 अंतर्गत, नवीन मुख्य निवडणूक आयुक्त हे सध्या आयोगात समाविष्ट असलेल्या निवडणूक आयुक्तांपैकी एक असू शकतात किंवा नवीन नाव ठरवता येते.


या कायद्याअंतर्गत, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शोध समिती पाच उमेदवारांची यादी तयार करते. सध्या अर्जुन राम मेघवाल हे कायदा आणि न्याय मंत्री आहेत. त्यानंतर पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असलेल्या निवड समितीद्वारे ही यादी विचारात घेतली जाते. जर एकमत झाले नाही तर समिती बहुमताच्या आधारे नाव ठरवते
Comments
Add Comment

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची