छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आराखड्यास मान्यता

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पाठपुराव्यास यश


श्रीरामपूर : शहरात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या आराखड्यास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागाने तसेच पुतळ्याच्या प्लेमॉडेललाही कला संचलनालयाची मान्यता मिळाल्याने स्मारकाच्या कामातील मार्ग निर्वेध झाला आहे.
शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची होती. यासाठी हिंदूत्ववादी संघटनांची आंदोलनही झाली.


यासर्व पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष नितिन दिनकर व तालुका भाजपा पदाधिकारी यानी ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कड़े पत्र व्यवहार करुन स्मारकाच्या कामाचा पाठपुरावा केला होता. ना विखे पाटील यांनी तात्काळ दखल घेताली व निधी उपलब्धता करुन देतानाच जागेची निश्चिती केली. स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी शासन स्तरावर आवश्यक असलेल्या मान्यता मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपालिकेस प्राप्त झाल्याने, स्मारकाच्या उभारणीतील अडथळे दुर झाले आहेत.



स्मारकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागाची परवानगी आवश्यक होती. यासाठी मंत्री विखे पाटील यांनी पाठपुरावा करुन, ही मान्यता तातडीने मिळविण्यासाठी प्रयत्न केले. या विभागाने स्मारकाच्या चबुत-याच्या आराखड्यास मान्यता दिल्याचे पत्रही नगरपालिका प्रशासनास मुख्य वास्तु शास्त्रज्ञ चेतन आक्रे यांनी पाठविले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याची मान्यताही शासनाच्या कला संचलनालयाने दिली आहे. आश्वारुढ पुतळ्याच्या शिल्पकारास दिलेल्या सुचने प्रमाणे फायबरच्या तयार केलेल्या मॉडेलमध्ये सुधारणा करुन, त्याचे रुपांतर ब्राँझ धातू मध्ये करण्यासाठी संचलनालयाने मान्यता दिल्याचे कळविल्याने शहरातील आश्वारुढ पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.


शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरच आश्वारुढ पुतळ्याच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व मान्यता मिळाल्याने शिव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्मारकाचे काम लवकरच सुरु होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
स्मारकाच्या कामासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्या बद्दल महायुतीच्या पदाधिका-यांनी अभिनंदन करुन आभार मानले आहेत. भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे तसेच सर्व हिंदूत्ववादी संघटनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा

विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे.

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून

पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा - विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक