छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आराखड्यास मान्यता

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पाठपुराव्यास यश


श्रीरामपूर : शहरात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या आराखड्यास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागाने तसेच पुतळ्याच्या प्लेमॉडेललाही कला संचलनालयाची मान्यता मिळाल्याने स्मारकाच्या कामातील मार्ग निर्वेध झाला आहे.
शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची होती. यासाठी हिंदूत्ववादी संघटनांची आंदोलनही झाली.


यासर्व पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष नितिन दिनकर व तालुका भाजपा पदाधिकारी यानी ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कड़े पत्र व्यवहार करुन स्मारकाच्या कामाचा पाठपुरावा केला होता. ना विखे पाटील यांनी तात्काळ दखल घेताली व निधी उपलब्धता करुन देतानाच जागेची निश्चिती केली. स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी शासन स्तरावर आवश्यक असलेल्या मान्यता मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपालिकेस प्राप्त झाल्याने, स्मारकाच्या उभारणीतील अडथळे दुर झाले आहेत.



स्मारकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागाची परवानगी आवश्यक होती. यासाठी मंत्री विखे पाटील यांनी पाठपुरावा करुन, ही मान्यता तातडीने मिळविण्यासाठी प्रयत्न केले. या विभागाने स्मारकाच्या चबुत-याच्या आराखड्यास मान्यता दिल्याचे पत्रही नगरपालिका प्रशासनास मुख्य वास्तु शास्त्रज्ञ चेतन आक्रे यांनी पाठविले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याची मान्यताही शासनाच्या कला संचलनालयाने दिली आहे. आश्वारुढ पुतळ्याच्या शिल्पकारास दिलेल्या सुचने प्रमाणे फायबरच्या तयार केलेल्या मॉडेलमध्ये सुधारणा करुन, त्याचे रुपांतर ब्राँझ धातू मध्ये करण्यासाठी संचलनालयाने मान्यता दिल्याचे कळविल्याने शहरातील आश्वारुढ पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.


शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरच आश्वारुढ पुतळ्याच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व मान्यता मिळाल्याने शिव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्मारकाचे काम लवकरच सुरु होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
स्मारकाच्या कामासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्या बद्दल महायुतीच्या पदाधिका-यांनी अभिनंदन करुन आभार मानले आहेत. भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे तसेच सर्व हिंदूत्ववादी संघटनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे