इंग्रजकालीन भंडारदरा धरणाला २०२६ मध्ये शंभर वर्षे पूर्ण

४९५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ : आ. किरण लहामटे


अकोले : इंग्रजांनी बांधलेल्या भंडारदरा धरणाला २०२६ मध्ये १०० वर्ष पूर्ण होत आहे.पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मनमोहक भंडारदरा धरणाचा परिसर असून पर्यटकांना आकर्षित करणारा आहे.भंडारदरा धरण परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून धरण पायथ्याशी असलेल्या उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे .तसेच धरण भिंत आणि स्पिल्वे परिसरात पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.


प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत भंडारदरा धरण येथे पर्यटन उद्यान विकास व परिसर सुशोभीकरण करणे अंतर्गत भंडारदरा परिसराचा विकास व सुशोभिकरणं करण्यासाठी ४९५ लक्ष रुपयाच्या विकास कामांचे उदघाटन आ.डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी प्रादेशिक पर्यटन विकास चे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



यात भंडारदरा धरणासाठी दोन प्रवेशद्वार तयार करण्यात येणार आहे.धरण परिसरात अंब्रेला फॉल समोरील परिसरात मूलभूत सुविधा म्हणजे पार्किग, शौचालय, पाण्याची व्यवस्था, कॅफेटेरिया तयार करणे,अँपी थिएटर तयार करणे, गजीबो तयार करणे, सेल्फी पॉईंट, व्हीव्हिंग गॅलरी तसेच स्थानिकांसाठी स्थानिक वस्तू, उत्पादन विक्री कलाकुसर विक्रीसाठी स्टॉल करण्यात येणार आहे.तसेच पर्यटक माहिती केंद्राद्वारे स्थानिक पर्यटक मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात येणार आहे.


यामुळे स्थानिक नागरिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होणार असून पर्यटकांना येत्या काजवा महोत्सवात पर्वणी ठरणार आहे. सदर होणाऱ्या विकास कामाबद्दल पर्यटकांनी अभिनंदन केले असून सदर विकास काम लवकर पूर्ण व्हावे अशी पर्यटकांकडून मागणी होत आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis Cabinet Mumbai : पाचव्या वित्त आयोगाला मुदतवाढ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटचे ५ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet) महत्त्वपूर्ण

Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ; सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : भारताची राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi)  सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमुळे (Bomb

क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून