परीक्षा देण्यासाठी पॅराशूटद्वारे उड्डाण करुन पोहोचला विद्यार्थी

सातारा : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली आहे. पेपर देण्यासाठी विद्यार्थी पॅराशूटद्वारे उड्डाण करुन परीक्षा केंद्रावर पोहोचला. या घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.





आपली परीक्षा आहे हे विसरुन एक विद्यार्थी पाचगणीत फिरायला गेला होता. त्याला मैत्रीणीने परीक्षा सुरू होण्याआधी कॉल करुन आठवण करुन दिली. परीक्षा आहे हे लक्षात येताच आयत्यावेळी विद्यार्थ्याने परीक्षा केंद्र गाठण्याचा निर्णय घेतला. परीक्षा केंद्रावर गेलो तर तिथे इतरांकडून पेन पेन्सिल मागून घेऊ आणि पेपर देऊ असा विचार विद्यार्थ्याने केला. अनेकदा विद्यार्थी परीक्षेच्यावेळी पंचाईत नको म्हणून एक - दोन जास्तीचे पेन पेन्सिल आणतात. यामुळे मित्रांच्या मदतीने परीक्षा देता येईल, असा विचार करुन विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर जाण्याचा ठाम निर्णय घेतला. पाचगणीतील पर्यटन स्थळावरुन परीक्षा केंद्रावर आयत्यावेळी पोहोचणे अशक्य होते. पण प्रसंगावधान राखून विद्यार्थ्याने पर्यटनस्थळी असलेल्या पॅराग्लायडर्सची भेट घेतली. विद्यार्थ्याने पॅराग्लायडर्सच्या प्रमुखाला अडचण समजावून सांगितली आणि मदत मागितली.



पॅराग्लायडर्सच्या प्रमुखाने विद्यार्थ्याला एका प्रशिक्षित पॅराग्लायडर सोबत पॅराशूटमधून उड्डाण करणे हिताचे असल्याचा सल्ला दिला. यानंतर तातडीने पॅराशूटचे पट्टे विद्यार्थ्याच्या आणि एका प्रशिक्षित पॅराग्लायडरच्या कंबरेला बांधण्यात आले. मग काय, पॅराग्लायडर सोबत विद्यार्थ्याने उंचावरुन खाली परीक्षा केंद्राच्या दिशेने उडी मारली. पॅराशूटच्या मदतीने उड्डाण केलेला विद्यार्थी पक्षाप्रमाणे आकाशात विहार करत काही मिनिटांत परीक्षा केंद्रावर पोहोचला.
Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे