Mumbai Goa highway : मुंबई गोवा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणार; नितीन गडकरी यांचे आश्वासन

कणकवली : आपण हवाई मार्गे मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai Goa highway) पाहणी केली असून, हा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले.


देवगडचे लोकप्रिय माजी आमदार स्व. जनार्दन मोरेश्वर उर्फ आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप समारंभाला ना. गडकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा उल्लेख केला आणि हा मार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.


तसेच, जलवाहतूक तोट्याची ठरत असल्याने सी-प्लेन हा उत्तम उपाय आहे. ही वाहतूक कोकण किनारपट्टीवर कोणताही निधी खर्च न करता सुरू करता येईल. यासाठी आपण पुढाकार घ्यावा, मी तुम्हाला योग्य ती मदत करेन असे आश्वासन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना दिले आहे.



त्याचप्रमाणे, वॉटर कार हा प्रकल्पही अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यावरून पाण्यात आणि पाण्यातून पुन्हा रस्त्यावर फिरणारी बस लवकरच कोकण किनारपट्टीवर सुरू करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.


आप्पासाहेब गोगटे यांचे स्वप्न असलेला इळये-वरंडवाडी पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारण्यासाठी आवश्यक निधी देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

भारतातील पहिल्या खासगी व्यावसायिक रॉकेट विक्रम १ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील स्पेसटेक स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी

Iran Israel War : अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला; थेट तेल डेपोला भीषण आग! आकाशात धुराचे आगीचे लोट

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही या हल्ल्यांना चोख उत्तर देत

T20 वर्ल्डकप फायनलसाठी कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी ? कसे असेल हवामान आणि कोण कोणत्या खेळाडूंना मिळेल खेळण्याची संधी ?

अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींसाठी ८ मार्चचा रविवार म्हणजे पर्वणी आहे. कारण आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता

धावत्या ट्रेनमध्ये आशुतोष महाराजांवर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?

मुंबई: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक छळाचा गंभीर गुन्हा दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी

Digital Fraud : डिजिटल फसवणूक झाल्यास आता आरबीआयकडून मिळणार नुकसान भरपाई

- आरबीआयचा नवीन मसुदा आराखडा तयार; ६ एप्रिलपर्यंत मागवल्या सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांमध्ये

आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी भारत मोडीत काढणार

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात