संरक्षण भिंतीचे बांधकाम जलजीवन योजनेच्या मुळावर

  71

मोखाडा(वार्ताहर): तालुक्यातील गाव पाड्यांची कायमची पाणीटंचाई मिटावी यासाठी जलजीवन मिशन योजनेतून धरणापासून ते पाण्याच्या टाकीपर्यत आणि टाकीपासून प्रत्येक गावात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला कुठे गटारी खोदून तर कुठे रस्ता खोदून पाइपलाइन टाकण्यात आली आहे; परंतु हीच पाइपलाइन आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संरक्षण भिंतीमुळे संकटात सापडली असून गावात पाणी पोहोचायच्या अगोदर रस्त्यातच गळती लागायला सुरुवात झाली आहे.

सध्या जिकडे नजर जाईल तिथपर्यंत संरक्षण भिंतीचे बांधकाम ठेकेदाराकडून सुसाट वेगाने चालू आहे. सुरुवातीला जलजीवन मिशन योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांना डावलून कुठे रस्ता खोदून काढला, तर कुठे गटार खोदले आणि आपले पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण करुन घेतले मात्र आता चित्र उलटे व्हायला सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदारांकडून खोदकाम केले जात आहे. त्या खोदकामात आसे ग्रामपंचायत हद्दीतील काही गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला गळती लागली होती. गेल्या दहा बारा दिवसांपासून जलजीवन मिशन योजनेतून पूर्ण केलेल्या पाईपलाईन द्वारे टाकीत पाणी पोहोचवणे तसेच टाकीतून प्रत्येक गावात पाणी जाते की नाही याची टेस्टींग सुरू आहे. या टेस्टींगमधून काही गाव पाड्यांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. त्याची चौकशी केली असता पाणी गळती होण्याचे प्रमुख कारण रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत बांधकामासाठी केलेले खोदकाम आहे, असे निदर्शनास आले. त्यामुळे गळती थांबण्यासाठी जलजीवन मिशनच्या कामगारांनी दुरुस्ती करुन पाईपलाईन पूर्ववत केली आहे; परंतु हा पाणी गळतीचा प्रकार इतरही ठिकाणी चालू आहे.

यामुळे गेली कित्येक दशक पाणीटंचाईमुळे व्याकुळ झालेल्या ग्रामीण भागातील जनतेला उशिरा का होईना पिण्यास पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र संरक्षण भिंतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारामुळे जल जीवन मिशनची पाइपलाइन संकटात सापडण्याची शक्यता ग्रामीण भागात तयार झाली आहे.
Comments
Add Comment

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.