संरक्षण भिंतीचे बांधकाम जलजीवन योजनेच्या मुळावर

मोखाडा(वार्ताहर): तालुक्यातील गाव पाड्यांची कायमची पाणीटंचाई मिटावी यासाठी जलजीवन मिशन योजनेतून धरणापासून ते पाण्याच्या टाकीपर्यत आणि टाकीपासून प्रत्येक गावात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला कुठे गटारी खोदून तर कुठे रस्ता खोदून पाइपलाइन टाकण्यात आली आहे; परंतु हीच पाइपलाइन आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संरक्षण भिंतीमुळे संकटात सापडली असून गावात पाणी पोहोचायच्या अगोदर रस्त्यातच गळती लागायला सुरुवात झाली आहे.

सध्या जिकडे नजर जाईल तिथपर्यंत संरक्षण भिंतीचे बांधकाम ठेकेदाराकडून सुसाट वेगाने चालू आहे. सुरुवातीला जलजीवन मिशन योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांना डावलून कुठे रस्ता खोदून काढला, तर कुठे गटार खोदले आणि आपले पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण करुन घेतले मात्र आता चित्र उलटे व्हायला सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदारांकडून खोदकाम केले जात आहे. त्या खोदकामात आसे ग्रामपंचायत हद्दीतील काही गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला गळती लागली होती. गेल्या दहा बारा दिवसांपासून जलजीवन मिशन योजनेतून पूर्ण केलेल्या पाईपलाईन द्वारे टाकीत पाणी पोहोचवणे तसेच टाकीतून प्रत्येक गावात पाणी जाते की नाही याची टेस्टींग सुरू आहे. या टेस्टींगमधून काही गाव पाड्यांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. त्याची चौकशी केली असता पाणी गळती होण्याचे प्रमुख कारण रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत बांधकामासाठी केलेले खोदकाम आहे, असे निदर्शनास आले. त्यामुळे गळती थांबण्यासाठी जलजीवन मिशनच्या कामगारांनी दुरुस्ती करुन पाईपलाईन पूर्ववत केली आहे; परंतु हा पाणी गळतीचा प्रकार इतरही ठिकाणी चालू आहे.

यामुळे गेली कित्येक दशक पाणीटंचाईमुळे व्याकुळ झालेल्या ग्रामीण भागातील जनतेला उशिरा का होईना पिण्यास पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र संरक्षण भिंतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारामुळे जल जीवन मिशनची पाइपलाइन संकटात सापडण्याची शक्यता ग्रामीण भागात तयार झाली आहे.
Comments
Add Comment

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय