सुरेश धस, धनंजय मुंडे यांच्यात मनभेद नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक: सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीचे समर्थन केले आहे. दोघांमध्ये अनेक बाबींमध्ये मतभेद नक्कीच आहेत, परंतु कोणतेही मनभेद नाहीत. दोघांनी मिळून काम केले तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो अशी आमची भूमिका आहे. सरपंच देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी झाली पाहिजे , अशी मुंडे यांच्यासह सर्वांचीच मागणी आजही कायम असून,


या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये असे आवाहन भाजपचे प्रदेश अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नाशिक दौऱ्यावर आले असता बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, भाजपने आमदार सुरेश धस यांना शांत राहा असे केव्हाच सांगितले नाही. उलट त्यांनी व धनंजय मुंडे यांनी एकत्र काम केले तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो. ७ जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद साधला आहे. १ कोटी ५१ लाख प्राथमिक सभासद नोंदणी टारगेट आहे. त्यात १ कोटी १४ लाख प्राथमिक सदस्य नोंदणी झाली आहे. ३ लाख सक्रिय सभासद पक्ष पदाधिकारी आहेत.


महाराष्ट्रात आगामी सर्व निवडणूका महायुतीत एकत्र लढणार आहेत. विधान सभा निवडणुकीत दिलेला विकसित महाराष्ट्र जाहिरनामा पूर्ण करणार आहे. राज्य सरकार कोणत्याही योजना बंद करणार नाहीत. या उलट केंद्र आणि राज्य मिळून ४७ योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. भारतीय जनता पक्ष कमजोर असलेल्या ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना पक्षप्रवेश देत आहे. मात्र जून्या कार्यकर्त्यांना न्याय देणार आहे. महाराष्ट्रातील लव्ह जिहाद कायदा सर्वाधिक कडक कायदा फडणवीस करणार आहे. ६३ लोकनियुक्त सरपंच ४०० ते ४५० विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.



दहा बारा दिवसात पालकमंत्री तिढा सुटेल


पालकमंत्री पद हे भौगोलिक परिस्थिती नुसार ठरत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.नाशिक आणि रायगड पालक मंत्री पदाचा तिढा दहा बारा दिवसात सुटेल. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित दिवसात बसून निर्णय घेऊ. आमच्यात कोठेही संघर्ष नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिकला येत्या काळात मंत्रीपद देण्यात येईल असेही स्पष्ट केले.

Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय