सुरेश धस, धनंजय मुंडे यांच्यात मनभेद नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक: सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीचे समर्थन केले आहे. दोघांमध्ये अनेक बाबींमध्ये मतभेद नक्कीच आहेत, परंतु कोणतेही मनभेद नाहीत. दोघांनी मिळून काम केले तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो अशी आमची भूमिका आहे. सरपंच देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी झाली पाहिजे , अशी मुंडे यांच्यासह सर्वांचीच मागणी आजही कायम असून,


या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये असे आवाहन भाजपचे प्रदेश अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नाशिक दौऱ्यावर आले असता बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, भाजपने आमदार सुरेश धस यांना शांत राहा असे केव्हाच सांगितले नाही. उलट त्यांनी व धनंजय मुंडे यांनी एकत्र काम केले तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो. ७ जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद साधला आहे. १ कोटी ५१ लाख प्राथमिक सभासद नोंदणी टारगेट आहे. त्यात १ कोटी १४ लाख प्राथमिक सदस्य नोंदणी झाली आहे. ३ लाख सक्रिय सभासद पक्ष पदाधिकारी आहेत.


महाराष्ट्रात आगामी सर्व निवडणूका महायुतीत एकत्र लढणार आहेत. विधान सभा निवडणुकीत दिलेला विकसित महाराष्ट्र जाहिरनामा पूर्ण करणार आहे. राज्य सरकार कोणत्याही योजना बंद करणार नाहीत. या उलट केंद्र आणि राज्य मिळून ४७ योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. भारतीय जनता पक्ष कमजोर असलेल्या ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना पक्षप्रवेश देत आहे. मात्र जून्या कार्यकर्त्यांना न्याय देणार आहे. महाराष्ट्रातील लव्ह जिहाद कायदा सर्वाधिक कडक कायदा फडणवीस करणार आहे. ६३ लोकनियुक्त सरपंच ४०० ते ४५० विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.



दहा बारा दिवसात पालकमंत्री तिढा सुटेल


पालकमंत्री पद हे भौगोलिक परिस्थिती नुसार ठरत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.नाशिक आणि रायगड पालक मंत्री पदाचा तिढा दहा बारा दिवसात सुटेल. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित दिवसात बसून निर्णय घेऊ. आमच्यात कोठेही संघर्ष नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिकला येत्या काळात मंत्रीपद देण्यात येईल असेही स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर