सुरेश धस, धनंजय मुंडे यांच्यात मनभेद नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक: सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीचे समर्थन केले आहे. दोघांमध्ये अनेक बाबींमध्ये मतभेद नक्कीच आहेत, परंतु कोणतेही मनभेद नाहीत. दोघांनी मिळून काम केले तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो अशी आमची भूमिका आहे. सरपंच देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी झाली पाहिजे , अशी मुंडे यांच्यासह सर्वांचीच मागणी आजही कायम असून,


या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये असे आवाहन भाजपचे प्रदेश अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नाशिक दौऱ्यावर आले असता बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, भाजपने आमदार सुरेश धस यांना शांत राहा असे केव्हाच सांगितले नाही. उलट त्यांनी व धनंजय मुंडे यांनी एकत्र काम केले तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो. ७ जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद साधला आहे. १ कोटी ५१ लाख प्राथमिक सभासद नोंदणी टारगेट आहे. त्यात १ कोटी १४ लाख प्राथमिक सदस्य नोंदणी झाली आहे. ३ लाख सक्रिय सभासद पक्ष पदाधिकारी आहेत.


महाराष्ट्रात आगामी सर्व निवडणूका महायुतीत एकत्र लढणार आहेत. विधान सभा निवडणुकीत दिलेला विकसित महाराष्ट्र जाहिरनामा पूर्ण करणार आहे. राज्य सरकार कोणत्याही योजना बंद करणार नाहीत. या उलट केंद्र आणि राज्य मिळून ४७ योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. भारतीय जनता पक्ष कमजोर असलेल्या ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना पक्षप्रवेश देत आहे. मात्र जून्या कार्यकर्त्यांना न्याय देणार आहे. महाराष्ट्रातील लव्ह जिहाद कायदा सर्वाधिक कडक कायदा फडणवीस करणार आहे. ६३ लोकनियुक्त सरपंच ४०० ते ४५० विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.



दहा बारा दिवसात पालकमंत्री तिढा सुटेल


पालकमंत्री पद हे भौगोलिक परिस्थिती नुसार ठरत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.नाशिक आणि रायगड पालक मंत्री पदाचा तिढा दहा बारा दिवसात सुटेल. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित दिवसात बसून निर्णय घेऊ. आमच्यात कोठेही संघर्ष नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिकला येत्या काळात मंत्रीपद देण्यात येईल असेही स्पष्ट केले.

Comments
Add Comment

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव