मुंबईत मानवतेला काळिमा फासणारी घटना, जन्मदात्याने चार वर्षांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारले

मुंबई : मुंबईत मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्याने चार वर्षांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारले. या प्रकरणात व्ही. बी. नगर पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा नोंदवला आहे. परवेझ सिद्धिकी याला पोलिसांनी चार वर्षांच्या मुलीच्य हत्येप्रकरणी अटक केली आहे.



परवेझ सिद्धिकी याचा त्याची दुसरी पत्नी सबा हिच्यासोबत वाद झाला. वाद वाढला आणि परवेझ सिद्धिकीने सबाला बेदम मारहाण केली. यानंतर त्याने चार वर्षांच्या आफिया हिला जोरात जमिनीवर आपटले. जमिनीवर जोरात आपटव्यामुळे आफिया गंभीर जखमी झाली. तिला उपचारांसाठी तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि आफियावर उपचार सुरू केले. पण थोड्याच वेळात आफियाने प्राण सोडले. तपासणी करुन डॉक्टरांनी आफियाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी पुढील पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य