Megablock : आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेकडून बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे रुळांसह सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीसाठीची कामे या कालावधीत करण्यात येतात. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.


मध्य रेल्वे सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीमा मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ ब्लॉकवेळेत अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द तर काही सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.



तसेच हार्बर रेल्वे कुर्ला ते वाशी या सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान लोकल फेऱ्या वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध असणार आहेत.


तर पश्चिम रेल्वे बोरिवली ते गोरेगाव ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावरून धावणार आहेत. यामुळे काही धीम्या-जलद लोकल रद्द राहणार आहेत. त्यामुळे अन्य फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.