मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टीचा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कोळसा भट्टी आणि लाकडी ओव्हनद्वारे स्वयंपाक करण्यास बंदी घातली आहे. किचनमध्ये कोळसा भट्टी ऐवजी इलेक्ट्रिकल उपकरणं, पीएनजी, एलपीजी इंधनाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. महापालिकेने रितसर नोटी बजावून बंदीची माहिती हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांच्या व्यवस्थापनाला दिली आहे.
मुंबई महापालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांना सात जुलै २०२५ पर्यंत कोळसा तंदूर भट्टींच्या जागेवर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयाचे पालन केले नाही तर कठोर कारवाई केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका कारवाई करत आहे. यामुळे कोळसा तंदूर भट्टीबाबतच्या नियमाचे उल्लंघन केल्यास व्यवसाय करण्याचा परवाना रद्द होऊ शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांना दिला आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…