Worli : वरळी अस्फाल्टसह छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या जागेचाही होणार लिलाव

मुंबई : महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून विचार करत वापरात नसलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसह वरळीतील अस्फाल्ट प्लांट अणि मलबार हिल येथील बेस्टचे रिसिव्हिंग स्टेशनच्या जागा लिलाव पध्दतीने भाडे तत्त्वावर जाहिरात प्रदर्शित केल्यानंतर याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर महापालिकेने वरळी अस्फाल्टच्या ( डांबर प्रकल्प ) जागेच्या लिलावासाठी जाहिरात प्रदर्शित केली असून आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसाठीही जाहिरात प्रदर्शित केली जाणार आहे. लवकरच मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांच्या मंजुरीने जाहिरात प्रदर्शित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.



महापालिकेने एकमेव वरळी अस्फाल्ट येथील १० हजार ८४७ चौरस मीटरची जागा जागा लिलाव पध्दतीने भाडेकरारावर देण्यासाठी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज प्राप्त होतील अशाप्रकारे जाहिरात प्रदर्शित केली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा भाडेकरावर देण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने अखेर महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी त्यांची समजूत काढल्याने या भूखंडावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतची जाहिरात लवकरच प्रदर्शित करून स्वारस्य अर्ज मागवले जातील, अशी माहिती मिळाली. मंडईच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ ८११६ चौरस मीटर एवढे असून याठिकाणी भविष्यात शॉपिंग सेंटर तथा मॉल उभाता येवू शकते.


सध्या मडईच्या जागेवर मंडई आणि महापालिका कार्यालय असे आरक्षण असले तरी भविष्यात भाडेकरारावर हा भूखंड दिल्यानंतर हे आरक्षण बदलले जावू शकते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वरळी अस्फाल्टच्या जागेतून महापालिकेला सुमारे २०६९ कोटी रुपये आणि मंडईच्या जागेतून महापालिकेला २१७५ कोटी रुपये एवढा महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला