शहराचे पाणी बंद करण्याचा 'जलसंपदा'चा इशारा

नियमितपणे पाणीपट्टी भरण्यात येत असल्याचा महापालिकेचा दावा


पुणे : जलसंपदा विभागाकडून पाणी घेणाऱ्या पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाची ७२६ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी तातडीने भरावी अन्यथा शहराचे पाणी बंद केले जाईल, असा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला. मात्र, पाणीपट्टीची थकबाकी १६० कोटी रुपये असून, नियमितपणे पाणीपट्टी भरण्यात येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.जलसंपदा विभागाने आकारलेल्या पाणीपट्टीविरोधात महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे याचिका दाखल असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.


पुणे शहरातील नागरिकांना पाणी देण्यासाठी पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाच्या वतीने खडकवासला, भामा आसखेड या धरणातून पाणी दिले जाते. शहराची वाढलेली हद्द व वाढणारी लोकसंख्या यामुळे महापालिकेला मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी धरणातून घ्यावे लागत आहे. त्यामुळे महापालिका अतिरिक्त पाणीपट्टीदेखील भरत आहे. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये पाणीपट्टीच्या आकारणीवरून जोरदार वाद निर्माण झालेला आहे.



महापालिका नागरिकांना पाणी देत असतानाही ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापरल्याने जलसंपदा विभाग औद्योगिक दराने पाण्याचे बिल महापालिकेला देत आहे. त्यामुळे महापालिकेला दीडशे ते दोनशे कोटी रुपये येणारे बिल सातशे कोटींच्या घरात गेले आहे. शहरात एकही प्रक्रिया उद्योग नसताना जलसंपदा विभागाने त्याची पाणीपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेला बिल दिले आहे.


तसेच व्यावसायिक वापर १५ टक्के दाखवला आहे. सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात असल्याने लावण्यात आलेला दंड यासह अन्य कारणांनी जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणीपट्टी पाठवली आहे. त्याची थकबाकी ७२६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये बैठका झाल्या, पण निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिकेने लवादात याचिका दाखल केली आहे.


जलसंपदा विभागाने आकारलेल्या पाणीपट्टीबाबत महापालिकेची हरकत आहे. त्यावर लवादात याचिका दाखल केली आहे. नियमित पाणीपट्टी १६० कोटी रुपये असून, ही रक्कम महापालिकेतर्फे भरली जाईल. - नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग



Comments
Add Comment

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत