सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचे केले मान्य

  64

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन आमने सामने आलेले भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.



धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यादिवशी रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं. दुस-या दिवशी झाकून-लपून नाही. तर त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याविरोधातील लढा आणि भेट या वेगळ्या गोष्टी आहेत. बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल. पर्वा भेटलो ते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलो होतो. लढ्यामध्ये आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधातच राहणार आहोत. मी धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो तेव्हा फक्त प्रकृतीची चौकशी केली. प्रकृतीची चौकशी करणे यात गैर काय आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लढा आणि प्रकृतीची चौकशी करायला जाणे यात काहीही संबंध नाही. हा संबंध कृपया जोडू नये. आमच्यात कोणीही मध्यस्थी केलेली नाही.



मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो - चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो, सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते. दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. दोघेही इमोशनल आहेत. दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो.
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक