कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत गायब झालेले आजोबा स्वतःच्या तेराव्याला झाले हजर!

लखनऊ : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात दररोज कोट्यवधी भाविक सहभागी होत आहेत. मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळत असल्याने प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली असली तरी त्या सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. काही दिवसांपूर्वी अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण बेपत्ता झाले. प्रशासन त्यांना शोधून घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.


ज्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही, अशा लोकांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तेरावे विधी केले. मात्र, काहींना अजूनही आप्त जिवंत परत येतील अशी आशा होती. अशीच एक अजब आणि आनंददायक घटना लखनऊमध्ये घडली.



स्थानिक रहिवासी खुंटी गुरु चेंगराचेंगरीत बेपत्ता झाले होते. त्यांचा मृत्यू झाला असावा असे समजून त्यांच्या शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. तेराव्याच्या दिवशी संध्याकाळी ब्राह्मण भोजनाची तयारी सुरू असताना अचानक खुंटी गुरु स्वतः तिथे हजर झाले! त्यांना पाहताच शेजाऱ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. काही वेळापूर्वी सुतकी असलेले वातावरण क्षणात आनंदोत्सवात बदलले. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय अवस्थींनी दिली.


खुंटी गुरु यांचे कुटुंब नाही; ते एकटेच राहत होते. मौनी अमावस्याच्या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी ते २८ जानेवारीला संगमस्थळी पोहोचले होते. २९ जानेवारीला झालेल्या चेंगराचेंगरीत ते हरवले आणि त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर, त्यांच्या मृत्यूचा गैरसमज होऊन शेजाऱ्यांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी छोटेखानी विधी आणि ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले. पण या सगळ्यात खुंटी गुरु सुखरूप परत येतील, हे कोणालाही वाटले नव्हते!

Comments
Add Comment

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.