कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत गायब झालेले आजोबा स्वतःच्या तेराव्याला झाले हजर!

  36

लखनऊ : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात दररोज कोट्यवधी भाविक सहभागी होत आहेत. मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळत असल्याने प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली असली तरी त्या सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. काही दिवसांपूर्वी अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण बेपत्ता झाले. प्रशासन त्यांना शोधून घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.


ज्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही, अशा लोकांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तेरावे विधी केले. मात्र, काहींना अजूनही आप्त जिवंत परत येतील अशी आशा होती. अशीच एक अजब आणि आनंददायक घटना लखनऊमध्ये घडली.



स्थानिक रहिवासी खुंटी गुरु चेंगराचेंगरीत बेपत्ता झाले होते. त्यांचा मृत्यू झाला असावा असे समजून त्यांच्या शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. तेराव्याच्या दिवशी संध्याकाळी ब्राह्मण भोजनाची तयारी सुरू असताना अचानक खुंटी गुरु स्वतः तिथे हजर झाले! त्यांना पाहताच शेजाऱ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. काही वेळापूर्वी सुतकी असलेले वातावरण क्षणात आनंदोत्सवात बदलले. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय अवस्थींनी दिली.


खुंटी गुरु यांचे कुटुंब नाही; ते एकटेच राहत होते. मौनी अमावस्याच्या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी ते २८ जानेवारीला संगमस्थळी पोहोचले होते. २९ जानेवारीला झालेल्या चेंगराचेंगरीत ते हरवले आणि त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर, त्यांच्या मृत्यूचा गैरसमज होऊन शेजाऱ्यांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी छोटेखानी विधी आणि ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले. पण या सगळ्यात खुंटी गुरु सुखरूप परत येतील, हे कोणालाही वाटले नव्हते!

Comments
Add Comment

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा