१६ वर्षांच्या संघर्षानंतर मिळणार हक्काचे घर; गोरेगाव पत्राचाळीतील रहिवाशांची घराची प्रतीक्षा संपली

मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळीतील रहिवाशांचा मागील १५ ते १६ वर्षांपासून घरांसाठी संघर्ष सुरु होता. म्हाडाकडून पत्राचाळ पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. २०२२ पासून म्हाडाकडून याचे बांधकाम सुरु होते. आता ते पूर्ण झाले असून लवकरच पत्राचाळीतील ६७२ रहिवाशांच्या घरांची प्रतिक्षा संपणार आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये या रहिवाशांना या घरांचा ताबा मिळणार आहे.


पत्राचाळीच्या रहिवाशांना घरांसाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. सोबतच विकासकांनी केलेल्या परवडीनं त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. आता त्यांचा संघर्ष संपला असून त्यांना हक्काची घरे देण्यात येणार आहेत. पत्राचाळीतील रहिवाशांसाठी १६ इमारतीत २.५ बीएचकेचे ६५० चौ.फुटाचे घर आणि त्याला ११७ चौ.फुटाची बाल्कनी देण्यात आली आहे. सोबतच, सुसज्ज असे दोन मजली पार्किंग, दोन गार्डन परिसर, फिटनेस सेंटर आणि मेडिटेशन सेंटर देखील देण्यात आले आहेत.



पुढील महिन्यात पत्राचाळीतील रहिवाशांना चाव्या देण्यासंदर्भात कार्यक्रम केला जाऊ शकतो. मात्र, म्हाडाकडून दिलेली कमिटमेंट पूर्ण न केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. म्हाडाने इमारतीच्या ठिकाणी ७२ कमर्शिअल दुकाने बांधल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.



असे असेल पत्राचाळीतील घर


- पत्राचाळीच्या जागेवर जवळपास १६ इमारतींची उभारणी.
- या इमारतीतील घर ६५० चौ.फुटाची असून ११७ चौ. फुटाची अतिरिक्त बाल्कनी देखील याला देण्यात आली आहे.
- अडीच हजार चौ.फुटांचे दोन कम्युनिटी हॉलची देखील उभारणी केली गेली आहे.
- दोन मजली पार्किंग, जिमनॅशियम, मेडिटेशन सेंटर आणि लहान मुलांना खेळण्यासाठीची सोय देखील केली गेलीय.
- प्रत्येक विंगला दोन लिफ्ट आणि एक स्टेअरकेसची उभारणी आहे.
- प्रत्येक फ्लॅटधारकाला एका पार्किंगची व्यवस्था देखील केली गेली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी सहकुटुंब ओढला श्रीजगन्नाथांचा रथ

मुंबई : भगवान श्रीजगन्नाथांच्या पवित्र रथयात्रेचे औचित्य साधून इस्कॉन, जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या

BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुंबई : मुंबई

Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त