RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी 'या' तारखेपर्यंत संधी!

पुणे : आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची निवड यादी जाहीर करण्यात येत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत संधी देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिली. २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी शिक्षण आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. (RTE Admission)



गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीई २५ टक्के लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी तालुकास्तर व वॉर्डस्तरावर पडताळणी समिती स्थापन केली आहे. लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विद्यार्थ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे. त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी.


पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगलवरील पत्ता व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी. या दृष्टीने आवश्यक सुविधा गटशिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात यावेत. प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. (RTE Admission)



...तर प्रवेश होणार रद्द


विद्यार्थ्यांनी खोटी, चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने नियमानुसार राबविली जात असून, प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश क्षमतेएवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील, तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील