Dust Pollution : चिपळुणात धुळीचा वाढता त्रास; नगरपालिकेचे दुर्लक्ष!

चिपळूण : शहरात अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे व चिपळूण येथे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे सध्या चिपळुणात वाढत्या धुळीच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. (Dust Pollution)



चिपळूणमधील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. गाड्यांच्या रहदारीमुळे धुळीचे लोट घराघरात शिरत आहेत. धुळीच्या त्रासाने चिपळूणकर सध्या बेजार झाले आहेत. मार्कंडीतील प्रभात रोड व आजूबाजूचे रस्ते, व चिपळुणातील अन्य रस्त्यावर देखील धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हजारो रुपये कर आकारणाऱ्या चिपळूण नागरपरिषदेला या रस्त्यावर पाणी मारण्याचे सौजन्य नसल्याने संताप व्यक्त होत आहे. लोकांनी ओरड केली की तेवढ्या पुरते यंत्रणेकडून टँकरद्वारे रस्त्यावर पाणी शिंपडल्याचे नाटक केले जात आहे. पायाभूत सोयी सुविधा पुरवताना, चिपळूण नगरपरिषद धुळीबाबत ठोस उपाययोजना करणार का?, रस्त्याचे डांबरीकरण होईपर्यंत पाणी मारणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


मुंबई-गोवा हायवेवर चिपळूण शहरात पुलाचे काम प्रगती पथावर आहे. याठिकाणीही आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार देखील रस्त्यावर पाणी मारत नसल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. सततच्या धुळीच्या त्रासाने अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना सहन करावे लागत आहेत. सतत घरामध्ये देखील धूळ येत असल्याने, हात लावाल तिथे धूळ अशी स्थिती चिपळूण शहरात झाली आहे. चिपळूण शहरात महानगर गॅसकडून गॅस लाईनचे काम सुरू आहे. यासाठी खोदाई करून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. (Dust Pollution)

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये