Dust Pollution : चिपळुणात धुळीचा वाढता त्रास; नगरपालिकेचे दुर्लक्ष!

  82

चिपळूण : शहरात अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे व चिपळूण येथे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे सध्या चिपळुणात वाढत्या धुळीच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. (Dust Pollution)



चिपळूणमधील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. गाड्यांच्या रहदारीमुळे धुळीचे लोट घराघरात शिरत आहेत. धुळीच्या त्रासाने चिपळूणकर सध्या बेजार झाले आहेत. मार्कंडीतील प्रभात रोड व आजूबाजूचे रस्ते, व चिपळुणातील अन्य रस्त्यावर देखील धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हजारो रुपये कर आकारणाऱ्या चिपळूण नागरपरिषदेला या रस्त्यावर पाणी मारण्याचे सौजन्य नसल्याने संताप व्यक्त होत आहे. लोकांनी ओरड केली की तेवढ्या पुरते यंत्रणेकडून टँकरद्वारे रस्त्यावर पाणी शिंपडल्याचे नाटक केले जात आहे. पायाभूत सोयी सुविधा पुरवताना, चिपळूण नगरपरिषद धुळीबाबत ठोस उपाययोजना करणार का?, रस्त्याचे डांबरीकरण होईपर्यंत पाणी मारणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


मुंबई-गोवा हायवेवर चिपळूण शहरात पुलाचे काम प्रगती पथावर आहे. याठिकाणीही आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार देखील रस्त्यावर पाणी मारत नसल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. सततच्या धुळीच्या त्रासाने अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना सहन करावे लागत आहेत. सतत घरामध्ये देखील धूळ येत असल्याने, हात लावाल तिथे धूळ अशी स्थिती चिपळूण शहरात झाली आहे. चिपळूण शहरात महानगर गॅसकडून गॅस लाईनचे काम सुरू आहे. यासाठी खोदाई करून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. (Dust Pollution)

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून