Best Bus Price Hike : 'बेस्ट'चा प्रवास महागणार! तिकीट दरात होणार दुप्पट वाढ  

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरचे दर वाढवण्यात आले होते. १ फेब्रुवारीपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली होती. तर कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महाग होत चालला आहे. अशातच आता बेस्ट बसचाही (Best Bus) प्रवास महागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मुंबईकरांसाठी लोकल नंतर बेस्ट बस प्रवासाचे प्रमुख साधन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बेस्ट सेवात होणारा तोटा, कर्मचाऱ्यांची देणी आणि मुंबई महापालिकेकडे सातत्याने करावी लागणारी आर्थिक मदतीची मागणी या पार्श्वभूमीवर तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे. (Best Bus Price Hike)



बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी काल बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाडेवाढ व बेस्टमधील बसचा ताफा या बाबत माहिती घेतली. यावेळी बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव उपाय असून यावर आणखी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे बैठकीत ठरले. नव्या दरानुसार बेस्ट बसचे भाडे हे १० रुपये तर एसी बसचे भाडे १२ रुपये करावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे.


सध्या बेस्ट तोट्यात असून हा तोटा भरून काढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. या सोबतच कर्मचाऱ्यांची देणी बेस्टला द्यायची आहे. त्यामुळे भाडेवाढीवर विचार सुरू आहे. या बाबत अद्याप निर्णय झाला नाही, अशी माहिती एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. (Best Bus Price Hike)



पीएमपीएलच्या ताफ्यात वाढ


पुण्यात देखील पीएमपीएलच्या ताफ्यात वाढ करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडसाठी तब्बल १ हजार बस घेतल्या जाणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडुन ५०० बस विकत घेतल्या जाणार आहे. पुणे आणि पिंपरीसाठी तब्बल ६००० बसची गरज आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये