Best Bus Price Hike : 'बेस्ट'चा प्रवास महागणार! तिकीट दरात होणार दुप्पट वाढ  

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरचे दर वाढवण्यात आले होते. १ फेब्रुवारीपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली होती. तर कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महाग होत चालला आहे. अशातच आता बेस्ट बसचाही (Best Bus) प्रवास महागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मुंबईकरांसाठी लोकल नंतर बेस्ट बस प्रवासाचे प्रमुख साधन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बेस्ट सेवात होणारा तोटा, कर्मचाऱ्यांची देणी आणि मुंबई महापालिकेकडे सातत्याने करावी लागणारी आर्थिक मदतीची मागणी या पार्श्वभूमीवर तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे. (Best Bus Price Hike)



बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी काल बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाडेवाढ व बेस्टमधील बसचा ताफा या बाबत माहिती घेतली. यावेळी बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव उपाय असून यावर आणखी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे बैठकीत ठरले. नव्या दरानुसार बेस्ट बसचे भाडे हे १० रुपये तर एसी बसचे भाडे १२ रुपये करावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे.


सध्या बेस्ट तोट्यात असून हा तोटा भरून काढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. या सोबतच कर्मचाऱ्यांची देणी बेस्टला द्यायची आहे. त्यामुळे भाडेवाढीवर विचार सुरू आहे. या बाबत अद्याप निर्णय झाला नाही, अशी माहिती एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. (Best Bus Price Hike)



पीएमपीएलच्या ताफ्यात वाढ


पुण्यात देखील पीएमपीएलच्या ताफ्यात वाढ करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडसाठी तब्बल १ हजार बस घेतल्या जाणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडुन ५०० बस विकत घेतल्या जाणार आहे. पुणे आणि पिंपरीसाठी तब्बल ६००० बसची गरज आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे