Best Bus Price Hike : 'बेस्ट'चा प्रवास महागणार! तिकीट दरात होणार दुप्पट वाढ  

  388

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरचे दर वाढवण्यात आले होते. १ फेब्रुवारीपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली होती. तर कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महाग होत चालला आहे. अशातच आता बेस्ट बसचाही (Best Bus) प्रवास महागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मुंबईकरांसाठी लोकल नंतर बेस्ट बस प्रवासाचे प्रमुख साधन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बेस्ट सेवात होणारा तोटा, कर्मचाऱ्यांची देणी आणि मुंबई महापालिकेकडे सातत्याने करावी लागणारी आर्थिक मदतीची मागणी या पार्श्वभूमीवर तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे. (Best Bus Price Hike)



बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी काल बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाडेवाढ व बेस्टमधील बसचा ताफा या बाबत माहिती घेतली. यावेळी बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव उपाय असून यावर आणखी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे बैठकीत ठरले. नव्या दरानुसार बेस्ट बसचे भाडे हे १० रुपये तर एसी बसचे भाडे १२ रुपये करावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे.


सध्या बेस्ट तोट्यात असून हा तोटा भरून काढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. या सोबतच कर्मचाऱ्यांची देणी बेस्टला द्यायची आहे. त्यामुळे भाडेवाढीवर विचार सुरू आहे. या बाबत अद्याप निर्णय झाला नाही, अशी माहिती एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. (Best Bus Price Hike)



पीएमपीएलच्या ताफ्यात वाढ


पुण्यात देखील पीएमपीएलच्या ताफ्यात वाढ करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडसाठी तब्बल १ हजार बस घेतल्या जाणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडुन ५०० बस विकत घेतल्या जाणार आहे. पुणे आणि पिंपरीसाठी तब्बल ६००० बसची गरज आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित