Bhiwandi : भिवंडीतील पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग!

  106

भिवंडी : महाशिवरात्री (Mahashivratri 2025) अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. या दिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच महादेवाच्या दर्शनासाठीदेखील भक्तांच्या रांगा लागल्या असतात. या पार्श्वभूमीवर भिवंडी (Bhiwandi News) येथे पांडवगडावरील कुंडात पुरातन शिवलिंग सापडले आहेत. महाशिवरात्री पूर्वीच हा चमत्कार घडल्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील वाहुली गावालगतच्या पठारावरील जंगलात पुरातन पांडव कुंड आहे म्हणून या पठाराला पांडव गडाने‌ देखील ओळखले जाते. शिवरात्री निमित्ताने साफ-सफाई करण्यासाठी काही तरूण तेथे गेले. यादरम्यान कुंडाच्या साफ-सफाईवेळी कुंडातील पाणी व गाळ काढत असताना अचानक कुंडाच्या तळाशी पुरातन असे शिवलिंग व पादुका आढळून आल्या. शिवलिंग आढळून आल्याचे पाहताच तरुणांनी या संदर्भाची माहिती तातडीने पोलिस व वनविभागाला दिली.


दरम्यान, पोलिस व वनविभागाचे कर्मचारी पांडवगडावर दाखल होत अधिक तपास सुरु केला. तसेच यावेळी शिवस्वरूपानंद‌ स्वामी व‌ माधव महाराज भोईर हे देखील गडावर पोहचले. स्वामींनी या तिर्थाला आजपासून पांडूकेश्वर नावाने ओळखले जावे असे घोषित केले. याचबरोबर शिवलिंग सापडल्याने या ठिकाणी यंदा भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Bhiwandi News)

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या