Palghar News : सांडपाण्यामुळे जलप्रदूषण, शहरातील मलनिस्सारण केंद्राचे लेखापरीक्षण

  87

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील सांडपाण्याबर प्रक्रिया करणारे मलनिस्सारण केंद्र हे संथ गतीने काम करत आहेत. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या कायम आहे. त्यासाठी या केंद्राचे शासनाच्या महाप्रीत (महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रायोगिक मर्यादित ) संस्थेमार्फत लेखा परीक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


मीरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी एकूण १९ मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) आहेत. हे केंद्र जवळपास पंधरा वर्षांपूर्वी उभे करण्यात आले आहेत. मात्र शहरात भूमिगत गटार योजनेचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे हे केंद्र अपेक्षेप्रमाणे कार्यरत नाही. परिणामी अनेकवेळा दूषित पाणी प्रक्रियाविनाच खाडी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणात मोठी वाढ झाली असल्याचे आरोप पालिकेवर सातत्याने करण्यात येत आहेत.



या पार्श्वभूमीवर शहरातील मलनिस्सारण केंद्राचे ‘लेखापरीक्षण’ करून घेण्याचा निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे. यात समोर येणाऱ्या त्रुटींवर काम करून हे केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्याकडे प्रशासनाचे लक्ष असल्याचा दावा काटकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महाप्रीत संस्थेला मलनिस्सारण केंद्राचे लेखापरीक्षण करणे, विजेची बचत करण्याच्या दुष्टीने उपाययोजना सूचवणे तसेच प्रकल्प कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ज्ञान भागीदार आणि निधी उपलब्ध करून देण्याचे काम सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि