Palghar News : सांडपाण्यामुळे जलप्रदूषण, शहरातील मलनिस्सारण केंद्राचे लेखापरीक्षण

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील सांडपाण्याबर प्रक्रिया करणारे मलनिस्सारण केंद्र हे संथ गतीने काम करत आहेत. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या कायम आहे. त्यासाठी या केंद्राचे शासनाच्या महाप्रीत (महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रायोगिक मर्यादित ) संस्थेमार्फत लेखा परीक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


मीरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी एकूण १९ मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) आहेत. हे केंद्र जवळपास पंधरा वर्षांपूर्वी उभे करण्यात आले आहेत. मात्र शहरात भूमिगत गटार योजनेचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे हे केंद्र अपेक्षेप्रमाणे कार्यरत नाही. परिणामी अनेकवेळा दूषित पाणी प्रक्रियाविनाच खाडी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणात मोठी वाढ झाली असल्याचे आरोप पालिकेवर सातत्याने करण्यात येत आहेत.



या पार्श्वभूमीवर शहरातील मलनिस्सारण केंद्राचे ‘लेखापरीक्षण’ करून घेण्याचा निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे. यात समोर येणाऱ्या त्रुटींवर काम करून हे केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्याकडे प्रशासनाचे लक्ष असल्याचा दावा काटकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महाप्रीत संस्थेला मलनिस्सारण केंद्राचे लेखापरीक्षण करणे, विजेची बचत करण्याच्या दुष्टीने उपाययोजना सूचवणे तसेच प्रकल्प कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ज्ञान भागीदार आणि निधी उपलब्ध करून देण्याचे काम सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

लवकरच 'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार

- सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झी स्टुडिओजनं आपल्या आगामी सिनेमा 'तुंबाडची

विक्रम गोखले यांच्या शेवटच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

- निधनाच्या ३ महिन्यांनंतर विक्रम गोखले यांच्या अंतिम सिनेमाचे पोस्टर रिलीज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

भारती सिंहच्या काजूला पाहिलं का?

- तीन महिन्यानंतर भारतीनं दाखवला दुसऱ्या मुलाचा चेहरा प्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंह हिने नुकताच तिच्या