PM Kisan Yojana : तारीख ठरली! 'या' दिवशी बळीराज्याच्या खात्यात जमा होणार २ हजार रुपये

मुंबई : केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्रातील महिलांसह, विद्यार्थी, लहान मुली, तरुण पिढी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली पीएम किसान योजनेबाबत (PM Kisan Yojana) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले आहेत. तर आता येत्या काही दिवसात १९ वा हप्ता मिळणार आहे.



पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आता १३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पैसे दिले जाणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारी रोजी किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.


दरम्यान, केवायसी प्रकिया पूर्ण असणाऱ्यांच्याच खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन केवायसी करा, असे आवाहन करण्यात येत आहे. (PM Kisan Yojana)



ऑनलाइन पद्धतीने केवायसी प्रक्रिया



  • तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • त्यानंतर होमपेजवर लिहलेल्या ई- केवायसी या ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर आधार नंबर टाका सर्च करा.

  • यानंतर मोबाईल नंबर टाका. तुम्हाला ओटीपी येईल.

  • यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

Comments
Add Comment

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराला सुवर्णवैभव! अधिक मासात भाविकाकडून १.५ किलो सोन्याचा कळस दान

कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला (Kolhapur Ambabai Temple) नव्या सुवर्णवैभवाची भर पडली आहे.

Mumbai-Goa Highway : प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबई-गोवा महामार्गावर मोठा दिलासा! संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील ३ महत्त्वाचे पूल लवकरच सुरू

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून