PM Kisan Yojana : तारीख ठरली! 'या' दिवशी बळीराज्याच्या खात्यात जमा होणार २ हजार रुपये

मुंबई : केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्रातील महिलांसह, विद्यार्थी, लहान मुली, तरुण पिढी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली पीएम किसान योजनेबाबत (PM Kisan Yojana) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले आहेत. तर आता येत्या काही दिवसात १९ वा हप्ता मिळणार आहे.



पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आता १३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पैसे दिले जाणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारी रोजी किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.


दरम्यान, केवायसी प्रकिया पूर्ण असणाऱ्यांच्याच खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन केवायसी करा, असे आवाहन करण्यात येत आहे. (PM Kisan Yojana)



ऑनलाइन पद्धतीने केवायसी प्रक्रिया



  • तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • त्यानंतर होमपेजवर लिहलेल्या ई- केवायसी या ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर आधार नंबर टाका सर्च करा.

  • यानंतर मोबाईल नंबर टाका. तुम्हाला ओटीपी येईल.

  • यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

Comments
Add Comment

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द