मीरा - भाईंदर महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामावर परिणाम

भाईंदर (वार्ताहर): मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आकृतीबंधानुसार मंजूर असलेल्या पदांच्या संख्येपैकी कार्यरत असलेल्या पदांच्या इतकीच रिक्त पदांची संख्या असल्याने त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर तर होत आहे त्याचबरोबर कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे.



महापालिकेत वर्ग १ ते ४ अशा संवर्गाची आकृतीबंधा नुसार २५७० मंजूर पदे आहेत. त्यातील १२३४ पदे कार्यरत आहेत तर १३३६ पदे रिक्त आहेत. वर्ग १ मधील रिक्त पदांमध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग प्रसूती तज्ञ, वर्ग २ मध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय अधिकारी, वर्ग ३ मध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, वाहन चालक तर वर्ग ४ मध्ये मजूर, रखवालदार अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे. कार्यरत पदांवरील काही जणांना पदोन्नती मिळाल्याने तर काहीजण सेवा निवृत्त झाल्यामुळे तसेच काहीजणांचे निधन झाल्याने रिक्त पदात वेळोवेळी वाढ होत गेली. तसेच मीरा-सभाईंदर शहर सुध्दा वेगाने वाढत गेले. त्यामुळे महापालिका कामात सुद्धा प्रचंड वाढ झाली. परिणामी रिक्त पदांची उणीव प्रकर्षाने भासू लागली. तसेच त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर तर होत आहे त्याचबरोबर कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश येवले यांनी केली आहे.



दरम्यान राज्य सरकारकडून नवीन आकृतिबंध मंजूर करण्याच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. याला अनेक महिने उलटले तरी अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. संवर्गाची पदे मंजूर नसल्यामुळे अनेक महापालिका कर्मचारी पदोन्नती पासून वंचित सुद्धा राहिले आहेत.
Comments
Add Comment

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५