मीरा - भाईंदर महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामावर परिणाम

भाईंदर (वार्ताहर): मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आकृतीबंधानुसार मंजूर असलेल्या पदांच्या संख्येपैकी कार्यरत असलेल्या पदांच्या इतकीच रिक्त पदांची संख्या असल्याने त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर तर होत आहे त्याचबरोबर कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे.



महापालिकेत वर्ग १ ते ४ अशा संवर्गाची आकृतीबंधा नुसार २५७० मंजूर पदे आहेत. त्यातील १२३४ पदे कार्यरत आहेत तर १३३६ पदे रिक्त आहेत. वर्ग १ मधील रिक्त पदांमध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग प्रसूती तज्ञ, वर्ग २ मध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय अधिकारी, वर्ग ३ मध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, वाहन चालक तर वर्ग ४ मध्ये मजूर, रखवालदार अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे. कार्यरत पदांवरील काही जणांना पदोन्नती मिळाल्याने तर काहीजण सेवा निवृत्त झाल्यामुळे तसेच काहीजणांचे निधन झाल्याने रिक्त पदात वेळोवेळी वाढ होत गेली. तसेच मीरा-सभाईंदर शहर सुध्दा वेगाने वाढत गेले. त्यामुळे महापालिका कामात सुद्धा प्रचंड वाढ झाली. परिणामी रिक्त पदांची उणीव प्रकर्षाने भासू लागली. तसेच त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर तर होत आहे त्याचबरोबर कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश येवले यांनी केली आहे.



दरम्यान राज्य सरकारकडून नवीन आकृतिबंध मंजूर करण्याच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. याला अनेक महिने उलटले तरी अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. संवर्गाची पदे मंजूर नसल्यामुळे अनेक महापालिका कर्मचारी पदोन्नती पासून वंचित सुद्धा राहिले आहेत.
Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे