Prabhakar Karekar Death : संगीत क्षेत्रातील महान तपस्वी हरपला - उपमुख्यमंत्री अजित पवार

  131

मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक महान तपस्वी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.




उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पंडित प्रभाकर कारेकर यांनी आपल्या अनोख्या गायनशैलीने आणि संगीत क्षेत्रातील सखोल ज्ञानाने श्रोत्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले. शास्त्रीय, नाट्यसंगीत आणि अभंग या तिन्ही प्रकारांवर त्यांची विलक्षण हुकमत होती. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या स्वरातील ‘मर्मबंधातील ठेव...’, ‘तेरो सुख दु:ख मे आयो काम...’, ‘तजरे अभिमान...जान गुणीजन’ ‘करिता विचार सापडले वर्म...’, ‘वक्रतुंड महाकाय...’ यांसारखी गाणी संगीतप्रेमींच्या हृदयात कायमस्वरूपी रुंजी घालत राहतील. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

पंडित प्रभाकर कारेकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, शिष्यवर्गाला तसेच चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून