Nitesh Rane : नितेश राणे बदलत आहेत कोकणातल्या राजकीय वर्तुळातले फासे

सिंधुदुर्ग : कोकणातल्या राजकीय वर्तुळातले फासे फिरल्याची बातमी समोर आली. देवगड नगरपंचायतचे दोन नगरसेवक तसेच तालुकाप्रमुख आणि शिरगांव ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलंय. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांना भाजपाच्या दिशेने वळवले आहे. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी भाजप पक्षामध्ये प्रेवेश केला आहे. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशानंतर सिंधुदुर्गातही अनेक नेत्यांनी कमळ हाती घेतल्याचं दिसून येत आहे. यावर मंत्री नितेश राणे म्हणाले," ही फक्त सुरवात आहे. नगरसेवक, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख नंतर माजी आमदार अशी रांग लागलेली आहे. आम्हाला फक्त तारीख ठरवायची आहे. उबाठा नावाचा गट आता संपलेला आहे.



बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे. आणि म्हणून जिल्ह्याचा विकास केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेत वाढत आहे. त्यामुळे चांगले कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र आम्ही चांगल्यातले चांगले कार्यकर्ते घेतो घाण घेत नाही." येणाऱ्या काळात भाजपा पक्ष कोकणात एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक