Latur School : विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात! लातूरमध्ये 'या' शाळेला ठोकले टाळे

लातूर : राज्यातल्या बोगस अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून योग्य कारवाई करण्यात येते. खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाने प्राथमिक शाळांना टाळे ठोकले आहे. दरम्यान, लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खासगी शाळेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा परिषदेने लातूरमधील 'नारायण ई-टेक्नो' शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आले आहे. (Latur School)



मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील अंबाजोगाई रोडवर नारायण ई-टेक्नो शाळा मागील एक वर्षांपासून मान्यता नसताना सुरू होती. वारंवार नोटीस पाठवली, पण फरक पडला नाही. त्यामुळे दंड ठोठावत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शाळेला जिल्हा परिषदेकडून तब्बल १९ लाख ९० हजार रूपयांचा दंड ठोकत कुलूप ठोकण्यात आले आहे.


दरम्यान, या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जवळपास ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र याचे अनधिकृतपणे अ‍ॅडमिशन करून घेण्यात आले आहे. मात्र मागच्या १ वर्षापासून ही शाळा शासनाच्या कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू असल्यामुळे ही शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे असणार आहे. (Latur School)

Comments
Add Comment

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उधना–ब्रह्मपूर अमृत भारत

Hingoli News : घटस्फोट न घेताच पोलीस कर्मचाऱ्याचे दुसरे लग्न; रोखण्यासाठी आलेल्या पत्नीला बेदम मारहाण

हिंगोली : पोलीस कर्मचाऱ्यानेच कायद्याचे उल्लंघन (Violation of Law) केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे

Pune Maval Landslide : पुण्यात मावळमध्ये दरड कोसळून घर गाडले; 9 जणांची सुटका,युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. विसापूर किल्ल्याच्या

Pune-Mumbai Ghat : पुणे-मुंबई घाट विभागातील रेल्वे दुरुस्ती युद्धपातळीवर; एक मार्ग सुरू, दोन लोकोमोटिव्हसह धावणार गाड्या

पुणे-मुंबई घाट विभागातील (Pune-Mumbai Ghat Section) रेल्वे मार्गाच्या (Railway Line) दुरुस्तीच्या (Restoration Works) कामांचा रेल्वेमंत्री अश्विनी

Ashadhi Wari 2026 : विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; वारीच्या वाटेवर प्रशासनाने उभारली खास सुविधा

 Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पुणे जिल्ह्यातून पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. या वारकऱ्यांच्या

IAS : राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला (Administrative System) अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा प्रशासकीय