मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली. ...
ज्या प्रकरणात सज्जन कुमारला दोषी ठरवले आहे ते प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ चे आहे. दिल्लीच्या सरस्वती विहारमध्ये वडील आणि मुलाची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणाऱ्या जमावाचे नेतृत्व सज्जन कुमारने केले होते. जमावाला सज्जन कुमारने चिथावणी दिली. यानंतर जमावाने बापलेकाला जीवंत जाळले होते. यानंतर घरात लुटालूट करण्यात आली. घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले.
जसवंत सिंह आणि तरुणदीप सिंह यांची हत्या करण्यात आली आणि घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणात सज्जन कुमार विरोधात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी न्यायालयाने आरोप निश्चित केले. सुनावणीअंती न्यायालयाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सज्जन कुमारला दोषी ठरवले.