काँग्रेसचा सज्जन कुमार १९८४ च्या शिख दंगली प्रकरणी दोषी

  68

नवी दिल्ली : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शिखविरोधी दंगल उसळली होती. या दंगलीला चिथावणी देऊन हत्या घडवून आणल्याप्रकरणी काँग्रेसच्या सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सज्जन कुमारच्या शिक्षेबाबत १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर सज्जन कुमारला द्यायच्या शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयाकडून दिला जाईल.



ज्या प्रकरणात सज्जन कुमारला दोषी ठरवले आहे ते प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ चे आहे. दिल्लीच्या सरस्वती विहारमध्ये वडील आणि मुलाची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणाऱ्या जमावाचे नेतृत्व सज्जन कुमारने केले होते. जमावाला सज्जन कुमारने चिथावणी दिली. यानंतर जमावाने बापलेकाला जीवंत जाळले होते. यानंतर घरात लुटालूट करण्यात आली. घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले.

जसवंत सिंह आणि तरुणदीप सिंह यांची हत्या करण्यात आली आणि घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणात सज्जन कुमार विरोधात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी न्यायालयाने आरोप निश्चित केले. सुनावणीअंती न्यायालयाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सज्जन कुमारला दोषी ठरवले.
Comments
Add Comment

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली: देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने एक

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली! रक्षाबंधनाच्या दिवशीच केली पत्नीसह दोन मुलींची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील करावल नगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी

'भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं पाडली'

बंगळुरू : ऑपरेशन सिंदूर कसे करायचे यासाठी मोदी सरकारने सैन्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते. सैन्याच्या सर्व

भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन

Raksha Bandhan 2025: सीमेवर अनोखे रक्षाबंधन! जवानांना बांधली 'ऑपरेशन सिंदूर'ची राखी

जम्मू काश्मीर: देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2025) पवित्र सण साजरा केला जात आहे, देशाच्या जम्मू काश्मीर सीमेवर देखील