काँग्रेसचा सज्जन कुमार १९८४ च्या शिख दंगली प्रकरणी दोषी

  45

नवी दिल्ली : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शिखविरोधी दंगल उसळली होती. या दंगलीला चिथावणी देऊन हत्या घडवून आणल्याप्रकरणी काँग्रेसच्या सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सज्जन कुमारच्या शिक्षेबाबत १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर सज्जन कुमारला द्यायच्या शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयाकडून दिला जाईल.



ज्या प्रकरणात सज्जन कुमारला दोषी ठरवले आहे ते प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ चे आहे. दिल्लीच्या सरस्वती विहारमध्ये वडील आणि मुलाची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणाऱ्या जमावाचे नेतृत्व सज्जन कुमारने केले होते. जमावाला सज्जन कुमारने चिथावणी दिली. यानंतर जमावाने बापलेकाला जीवंत जाळले होते. यानंतर घरात लुटालूट करण्यात आली. घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले.

जसवंत सिंह आणि तरुणदीप सिंह यांची हत्या करण्यात आली आणि घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणात सज्जन कुमार विरोधात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी न्यायालयाने आरोप निश्चित केले. सुनावणीअंती न्यायालयाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सज्जन कुमारला दोषी ठरवले.
Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व