नवी दिल्ली : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शिखविरोधी दंगल उसळली होती. या दंगलीला चिथावणी देऊन हत्या घडवून आणल्याप्रकरणी काँग्रेसच्या सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सज्जन कुमारच्या शिक्षेबाबत १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर सज्जन कुमारला द्यायच्या शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयाकडून दिला जाईल.
ज्या प्रकरणात सज्जन कुमारला दोषी ठरवले आहे ते प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ चे आहे. दिल्लीच्या सरस्वती विहारमध्ये वडील आणि मुलाची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणाऱ्या जमावाचे नेतृत्व सज्जन कुमारने केले होते. जमावाला सज्जन कुमारने चिथावणी दिली. यानंतर जमावाने बापलेकाला जीवंत जाळले होते. यानंतर घरात लुटालूट करण्यात आली. घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले.
जसवंत सिंह आणि तरुणदीप सिंह यांची हत्या करण्यात आली आणि घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणात सज्जन कुमार विरोधात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी न्यायालयाने आरोप निश्चित केले. सुनावणीअंती न्यायालयाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सज्जन कुमारला दोषी ठरवले.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…