Mumbai Breaking News : मुंबईला GBSचा विळखा; नायर रुग्णालयातील रुग्णाचा घेतला बळी

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यभरात थैमान घालणाऱ्या GBS ( गुलेन-बॅरे सिंड्रोम ) आजाराने मुंबईत एका रुग्णाचा बळी घेतला आहे. पुणे सोलापूर नंतर मुंबईतही GBS आजाराने शिरकाव केलेला पाहायला मिळतोय.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू GBS मुळे झाल्याचा उघडकीस आलं आहे. GBS च्या मृत्यूचा आकडा आता ८ वर गेला आहे. राज्यात १९७ रुग्ण आहेत सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यामध्ये १७२ रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.



तर ५० रुग्ण आयसीयु मध्ये दाखल केले आहेत आणि २० व्हेंटिलेटर असल्याचे समजते आहे. हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या आजाराची लक्षण जाणवताच प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.



जीबीएसबाबतची महत्त्वाची माहिती


1.हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराची लक्षणे स्वाइन फ्लूसारखीच आहेत. या आजारावर अद्याप कायमस्वरुपी ठोस उपचार उपलब्ध झालेला नाही.
2.श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरची गरज भासते.
3.स्नायू कमकुवत होतात आणि अवयव सुन्न होतात.
4.पायांमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा येणे यासारखी लक्षणे दिसतात. नंतर ती हातांमध्येही पसरू शकतात. 5.यामुळे अर्धांगवायू किंवा कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो.
6.जीबीएसमध्ये अर्धांगवायू पायांपासून सुरू होऊ शकतो आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांपर्यंत पोहोचू शकतो.
7.लक्षणे सलग काही आठवडे टिकू शकतात.
8.वेळेत उपचार केल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते.
9.आजारी व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्याने उपचार करुन घेणे हिताचे.
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी