Mumbai Breaking News : मुंबईला GBSचा विळखा; नायर रुग्णालयातील रुग्णाचा घेतला बळी

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यभरात थैमान घालणाऱ्या GBS ( गुलेन-बॅरे सिंड्रोम ) आजाराने मुंबईत एका रुग्णाचा बळी घेतला आहे. पुणे सोलापूर नंतर मुंबईतही GBS आजाराने शिरकाव केलेला पाहायला मिळतोय.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू GBS मुळे झाल्याचा उघडकीस आलं आहे. GBS च्या मृत्यूचा आकडा आता ८ वर गेला आहे. राज्यात १९७ रुग्ण आहेत सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यामध्ये १७२ रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.



तर ५० रुग्ण आयसीयु मध्ये दाखल केले आहेत आणि २० व्हेंटिलेटर असल्याचे समजते आहे. हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या आजाराची लक्षण जाणवताच प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.



जीबीएसबाबतची महत्त्वाची माहिती


1.हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराची लक्षणे स्वाइन फ्लूसारखीच आहेत. या आजारावर अद्याप कायमस्वरुपी ठोस उपचार उपलब्ध झालेला नाही.
2.श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरची गरज भासते.
3.स्नायू कमकुवत होतात आणि अवयव सुन्न होतात.
4.पायांमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा येणे यासारखी लक्षणे दिसतात. नंतर ती हातांमध्येही पसरू शकतात. 5.यामुळे अर्धांगवायू किंवा कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो.
6.जीबीएसमध्ये अर्धांगवायू पायांपासून सुरू होऊ शकतो आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांपर्यंत पोहोचू शकतो.
7.लक्षणे सलग काही आठवडे टिकू शकतात.
8.वेळेत उपचार केल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते.
9.आजारी व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्याने उपचार करुन घेणे हिताचे.
Comments
Add Comment

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि