Mumbai Breaking News : मुंबईला GBSचा विळखा; नायर रुग्णालयातील रुग्णाचा घेतला बळी

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यभरात थैमान घालणाऱ्या GBS ( गुलेन-बॅरे सिंड्रोम ) आजाराने मुंबईत एका रुग्णाचा बळी घेतला आहे. पुणे सोलापूर नंतर मुंबईतही GBS आजाराने शिरकाव केलेला पाहायला मिळतोय.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू GBS मुळे झाल्याचा उघडकीस आलं आहे. GBS च्या मृत्यूचा आकडा आता ८ वर गेला आहे. राज्यात १९७ रुग्ण आहेत सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यामध्ये १७२ रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.



तर ५० रुग्ण आयसीयु मध्ये दाखल केले आहेत आणि २० व्हेंटिलेटर असल्याचे समजते आहे. हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या आजाराची लक्षण जाणवताच प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.



जीबीएसबाबतची महत्त्वाची माहिती


1.हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराची लक्षणे स्वाइन फ्लूसारखीच आहेत. या आजारावर अद्याप कायमस्वरुपी ठोस उपचार उपलब्ध झालेला नाही.
2.श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरची गरज भासते.
3.स्नायू कमकुवत होतात आणि अवयव सुन्न होतात.
4.पायांमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा येणे यासारखी लक्षणे दिसतात. नंतर ती हातांमध्येही पसरू शकतात. 5.यामुळे अर्धांगवायू किंवा कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो.
6.जीबीएसमध्ये अर्धांगवायू पायांपासून सुरू होऊ शकतो आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांपर्यंत पोहोचू शकतो.
7.लक्षणे सलग काही आठवडे टिकू शकतात.
8.वेळेत उपचार केल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते.
9.आजारी व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्याने उपचार करुन घेणे हिताचे.
Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.