महापालिका विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी येणार पाच कोटी खर्च

किड्झानिया पार्कसाठी प्रत्येक विद्यार्थी ७०० रुपये, तर राणीबागेत ६३० कोटी रुपये खर्च


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापलिका शाळांमधील मुलांची यंदाही भायखळा राणीबाग आणि घाटकोपर येथील किडझानिया पार्कमध्ये नियोजित असून या किडझानिया पार्कसाठी विद्यार्थ्यांमागे प्रत्येकी ७०० रुपये, तर राणीबागेतील सहलीसाठी प्रत्येकी ६३० रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे राणीबागेची जागा महापालिकेची असूनही त्याठिकाणी महापालिका प्रत्येकी ६३० रुपये मोजणार आहे, महापालिका शाळांमधील इयत्ता ४थी विद्यार्थ्यांसाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय आणि इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घाटकोपर 'किड्झानिया थीम पार्क, येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.



महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महापालिका शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात. महापालिकेतील शालेय मुलांची सहल राणीबागेत आयोजित करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असून त्यानुसार मागील काही वर्षांपासून इयत्ता चौथीच्या मुलांना राणीबागेत सहलीसाठी नेले जाते. विमानात प्रवास करताना कशा प्रकारे वागले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींची पूर्तता व आवश्यक आहे. बँकेचे व्यवहार कसे करायचे, बिस्कोटे अथवा आईस्क्रीम कसे करावयाचे. आग लागल्यास फायर ब्रिग्रेड कार्य कसे करते अशा विविध गोष्टी विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळतात. त्यामुळे इयत्ता सातवीतील शालेय मुलांची सहल किडझानिया येथ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


१५ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून) एकदिवसीय सहलींचे आयोजन करण्याच्या दृष्टिकोनातून शाळांकडून वेळापत्रक बनवण्यात आले आहे. यासाठी राणीबागेतील सहलीची जबाबदारी श्रीपांश एंटरप्रायझेस या कंपनीवर सोपवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील