Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश

  163

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या महिन्यात पाकिस्तानात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९ फेब्रुवारीला होईल तर फायनल सामना ९ मार्चला खेळवला जाईल. यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. त्यात दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत साशंकता होती.


मात्र आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर आपला निर्णय दिला आहे. बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीत दुखापत झाली होती.


त्याच्या जागी स्टार स्पिनर वरूण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, यशस्वीला नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट म्हणून ठेवण्यात आले आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑलराऊंडर शिवम दुबेलाही नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट म्हणून ठेवण्यात आले आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल(उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर.


नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट- यशस्वी जायसवाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.


Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल