Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या महिन्यात पाकिस्तानात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९ फेब्रुवारीला होईल तर फायनल सामना ९ मार्चला खेळवला जाईल. यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. त्यात दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत साशंकता होती.


मात्र आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर आपला निर्णय दिला आहे. बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीत दुखापत झाली होती.


त्याच्या जागी स्टार स्पिनर वरूण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, यशस्वीला नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट म्हणून ठेवण्यात आले आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑलराऊंडर शिवम दुबेलाही नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट म्हणून ठेवण्यात आले आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल(उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर.


नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट- यशस्वी जायसवाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.


Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.