Mumbai Breaking News : महिलेचा खून करून पळालेल्या मारेकऱ्याच्या मुसक्या २ तासात आवळल्या

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे परिसरात सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता वांद्रयातच ज्येष्ठ महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेचे हात बांधून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. मात्र सीसीटीव्ही फुटेज सापडल्याने पोलिसांनी तपास करत मारेकऱ्याच्या मुसक्या अवघ्या २ तासात आवळल्या आहे. असे असले तरी या हत्येच्या घटनेने वांद्रे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील रिक्लेमेशन परिसरातील इमारतीत राहणाऱ्या ६४ वर्षीय रेखा खोंडेंची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्याने रेखा खोंडेंचे हात बांधून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. रेखा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी हा चोरीच्या उद्देशाने तीन दिवसांपूर्वी घरात घुसला होता. बंद खोलीतून कुजलेला वास येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तब्ब्ल दोन तासात मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या. मारेकऱ्याच नाव शहरीफ अली समशेर शेख (वय २७ वर्षे ) असून तो मृत महिलेच्या शेजारीच राहत होता. या घटनेने वांद्रे परिसर हादरलं आहे.

Comments
Add Comment

आता मेट्रो तिकीट Uber वर; प्रवाश्यांना तिकीटासह मिळणार नवीन सवलती

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

...तर गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द होणार?

नव्याने निविदा मागवून कंपनीची निवड केली जाण्याची शक्यता मुंबई :  गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या