Ganpati Visarjan 2025 : मुंबईतील गणपतींचे अखेर ११व्या दिवशी विसर्जन!

मुंबई : गणेशोत्सव हा सर्वांच्या जवळचा विषय आहे. १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणपती उत्सव आजही कायम आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने बाप्पाची वाट बघत असतात. बाप्पाला घरी घेऊन येण्यापासून ते विसर्जनापर्यंत भक्तांचा उत्साह कायम असतो. मात्र यावर्षी मुंबईतील काही भागात माघी गणेशोत्सवाला स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचा विसर्जन सोहळ्याला महानगरपालिकेने विरोध केला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आज ११व्या दिवशी या मूर्तींचे विसर्जन करण्याचे निर्देश मंडळांना मिळाले आहेत.



कांदिवलीत प्रसिद्ध असणारा चारकोपचा राजा गणेश जयंतीला (दि १ फेब्रुवारी ) मंडळात स्थापित झाला. या मूर्तीची हुबेहूब प्रतिमा लालबागच्या राजासारखी आहे. येथे दर्शनासाठी भाविक फार दुरून येतात. ही मूर्ती पीओपीची असल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेने या मूर्तीचं विसर्जन करण्यास मनाई केली होती. मार्वे समुद्रावर पोलिसांनी मंडळाला अडवून या मूर्तीला परत घेऊन जाण्यास सांगितलं. पर्यावरणाला हानिकारक असलेली पीओपी मूर्ती समुद्राला मोठ्या प्रमाणात अशुद्ध करू शकते.



महानगरपालिकेच्या या निर्णयावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाविकांमध्ये भडका उडाला. विसर्जन न झालेली ही एकच मूर्ती नसून मुंबईतील अशा ११ मुर्त्यांचे विसर्जन थांबवले गेले होते. दरम्यान आता महानगरपालिकेने यावर तोडगा काढत मंडळांना कृत्रिम तलाव निर्माण करून देऊन त्यामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आदेश दिले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली