PM Modi AI Summit : 'तंत्रज्ञान नोकऱ्या खात नाही, याला इतिहास साक्षी'; PM मोदीचे AI परिषदेत आवाहन

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एआय परिषदेत (AI Summit) मोठी घोषणा केली. भारत आपल्या लार्ज लँग्वेज मॉडेल (मोठ्या भाषिक प्रतिमान) यावर काम करत आहे. त्याचबरोबर एआयवर आधारित ज्ञानाचा पूल तयार करत आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी एआयशी संबंधित मुद्द्यांवर मोदींनी भाष्य केले. पॅरिसमधील एआय कृती परिषदेचा भारत सह-अध्यक्ष आहे.



एआय परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "एआय आता गरज बनले आहे. आमच्याजवळ जगातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आहे. त्याचबरोबर आपल्यावर लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीसुद्धा आहे. यंत्रांची ताकद वाढत असल्याने काही लोक चिंतेत आहेत. पण, यात काळजी करण्यासारखं काही नाही."



एआयमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील - मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले, "एआय लाखो लोकांचे आयुष्य बदलत आहे. काळाबरोबर रोजगाराचे स्वरूपही बदलत आहे. आपल्याला एआयमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संकटाकडेही लक्ष द्यावं लागेल."


"तंत्रज्ञान नोकऱ्या खात नाही, याला इतिहास साक्षी आहे. एआयमुळेही नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील आणि आपल्याला नव्या संधीसाठी लोकांना तयार करावे लागेल", असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.



पंतप्रधान मोदी यांनी भाषणात भारताच्या एलएलएमबद्दलही (लार्ज लँग्वेज मॉडेल) माहिती दिली. भारत लवकरच आपले लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित करेल, असे ते म्हणाले. भारताच्या एलएलएम मॉडेलची चर्चा होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याबद्दल माहिती दिली होती. भारत लवकरच एलएलएम हे एआय मॉडेल विकसित करेल, असे त्यांनी म्हटले होते.

Comments
Add Comment

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल

काँगोत भीषण दुर्घटना ! किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

दक्षिण आफ्रिका  : देश काँगोत पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली आहे. किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या